मुंबई : द केरला स्टोरी चित्रपटावरून देशात मागील काही दिवसापासून वाद सुरू झाला आहे. कर्नाटकात निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे असे प्रकरण बाहेर काढले जात आहेत. अन् या चित्रपटाच्या निर्मात्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“शरद पवारांना वडीलकीच्या नात्याने बोलण्याचा अधिकार”, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
ज्या प्रकारचे षडयंत्र चालेलं आहे. मुलींचं अपहरण करून धर्माचा दुरूपयोग केला जात आहे. या सगळ्या गोष्टी सत्य कथेच्या माध्यमाधून समोर आल्या आहेत. त्यामुळे जे लोकं असं बोलले आहेत की, चित्रपट निर्मात्याला फाशी दिली पाहिजे. त्यांच्या सडक्या मेंदुच्या सडक्या विचारांना भर चौकात फाशी देण्याची वेळ आली आहे. असं चित्रपट बघितल्यानंतर म्हणू शकतो. असा हल्ला फडणवीसांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला आहे.
हेही वाचा…“सकाळचा भोंगा रोज बघतो, पण त्या भोंग्यावर मला जायचं नाही”, श्रीकांत शिंदेंची राऊतांवर टिका
जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. चित्रपटाच्या निर्मात्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी द्या, असं त्यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर आता त्यांच्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्याच्या वतीनं तक्रार दाखल करण्यात आली आहे. आव्हाड यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“रडायची सुद्धा हेडलाईन होऊ शकते,” ‘रडरागिणी’ म्हणत मिटकरींचा अंधारेंवर हल्लाबोल
हेही वाचा…Karnataka Election 2023..! “कर्नाटकात मोदी अन् शहांनी घाम अन् पैसा गाळूनही त्यांचा पराभव होईल”
हेही वाचा…“निवडणुकीत अजित पवारांचा हात लागतो, नाहीतर ती जिंकता येत नाही”,अमोल कोल्हेंनी केले पवारांचं कौतुक
हेही वाचा…“आम्हाला शुन्यातून सुरूवात करायचीय, म्हणून, आम्ही आता… ” शरद पवारांनी केलं मोठं विधान, एकच चर्चा
हेही वाचा…..“संजय राऊतांना दुसऱ्यांच्या घरात डोकवण्याचा आजार जडलाय”, संजय शिरसाठ