मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. तर हा निकाल सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांकडे दिला जाऊ शकतो. असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टिका केली आहे.
हेही वाचा…..“संजय राऊतांना दुसऱ्यांच्या घरात डोकवण्याचा आजार जडलाय”, संजय शिरसाठ
आम्ही न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहे. या देशातील राजकीय स्वैराचार रोखण्याची ताकद कोर्टोत आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असं आम्हाला आजही वाटते. तसेच राहुल नार्वेकर यांनी आधी पदाचा राजीनामा द्यावा. ज्यांनी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला आहे. त्यांना निर्णय घेऊ द्या. नरहरी झिरवळ यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडेच हे प्रकरण गेलं पाहिजे. त्यांचा निर्णय दुसरा अध्यक्ष फिरवू शकत नाही. असं राऊतांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“शरद पवारांना वडीलकीच्या नात्याने बोलण्याचा अधिकार”, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
दरम्यान, या प्रकरणाचा मुद्या सर्वोच्च न्यायालयाने माझ्याकडे सोपवला तर १६ आमदार अपात्र ठरवले जाऊ शकतो. कारण संविधानानुसार मला आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे तर त्या आमदारांना अपात्र ठरवायचा की नाही, तो अधिकार मला असल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…..“सडक्या मेंदुच्या विचारांना फाशी देण्याची वेळ आलीय”,फडणवीसांची आव्हाडांवर जहरी टिका
हेही वाचा…“रडायची सुद्धा हेडलाईन होऊ शकते,” ‘रडरागिणी’ म्हणत मिटकरींचा अंधारेंवर हल्लाबोल
हेही वाचा…Karnataka Election 2023..! “कर्नाटकात मोदी अन् शहांनी घाम अन् पैसा गाळूनही त्यांचा पराभव होईल”
हेही वाचा…“निवडणुकीत अजित पवारांचा हात लागतो, नाहीतर ती जिंकता येत नाही”,अमोल कोल्हेंनी केले पवारांचं कौतुक
हेही वाचा…“आम्हाला शुन्यातून सुरूवात करायचीय, म्हणून, आम्ही आता… ” शरद पवारांनी केलं मोठं विधान, एकच चर्चा