पुणे : राष्ट्रवादीचे शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. अनेक घटनांमधून अमोल कोल्हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं तसे संकेत देखील अमोल कोल्हे यांच्याकडून देण्यात आले आहेत. यातच आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांनी याबाबत भाष्य केलं आहे. त्यामुळे आता अमोल कोल्हे खरचं भाजपमध्ये प्रवेश करणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…“माझ्यावर आग ओकणारे आता…” ‘द केरला’ स्टोरी प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया
अमोल कोल्हे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुक लढवायची की नाही? लढवली तर कोणत्या पक्षाकडून, कोणत्या मतदारसंघातून लढायची? या विषयी अद्याप काहीह ठरवलेले नाही. योग्य वेळी परिस्थिती पाहून निर्णय घेईन, असं अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. तसेच एखादा मतदार संघ म्हणजे आपली मक्तेदारी आहे, असे मानणे चुकीचे आहे. कधीतरी बदल होणारच आहे. असंही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
हेही वाचा…“शरद पवारांना वडील मानुन सुषमा अंधारेंनी अजित पवारांची तक्रार केली”
दरम्यान, राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. राज्यात सध्या महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे-फडणवीस सरकार अशी राजकीय लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये जोरदार रंगत बघायला मिळण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महानिकाल…! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा उद्या निकाल..,! राजकारण तापणार, सरकार कोसळणार ?
हेही वाचा…“160 कोटीचं काम 263 कोटी रूपयाला”, तीन ‘भ्रष्टाचाराची फाईल्स’ घेऊन आदित्य ठाकरे राज्यपालांच्या भेटीला
हेही वाचा…“आम्ही सर्व कायदेशीर केलंय, निकालाकडे आम्ही आशादायी,” राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया
हेही वाचा…..“महाविकास आघाडीतील काही आमदार फडणवीस अन् शिंदेंच्या संपर्कात”,मंत्र्यांनी केला मोठा दावा
हेही वाचा…“अन् संजय राऊत पोहचले तुरूंगात, ‘या’ प्रकरणात हजर राहण्याचे होते आदेश”