मुंबई : गेल्या दहा महिन्यापासून सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही महिन्यापासून शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी पाच न्यायाधीशांच्या घटनीपीठांकडे युक्तिवाद केले आहेत. त्यामुळे आता मागील काही दिवसापासून वाट पाहत असलेल्या प्रकरणाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“शरद पवारांना वडील मानुन सुषमा अंधारेंनी अजित पवारांची तक्रार केली”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करून भाजपसोबत युती केली. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने १६ आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. त्यामुळे आता उद्या जर शिंदेंच्या विरोधात निकाल लागला तर राज्यातील सरकार देखील कोसळू शकतो. त्यामुळे याची उत्सुकता आता सगळ्यांना लागली आहे.
हेही वाचा…“नार्वेकर तुम्ही अगोदर पदाचा राजीनामा द्या, अपात्रतेचा निर्णय झिरवळांना घेऊ द्या”
दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आमच्याच बाजूने लागणार असल्याचा दावा केला जात आहे. यातच १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला जाईल. असं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. तर माझ्याकडे हा निकाल आला तर १६ आमदार अपात्र ठरतील असं उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्या सर्वोच्च न्यायालय नेमका काय निकाल देणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“160 कोटीचं काम 263 कोटी रूपयाला”, तीन ‘भ्रष्टाचाराची फाईल्स’ घेऊन आदित्य ठाकरे राज्यपालांच्या भेटीला
हेही वाचा…“आम्ही सर्व कायदेशीर केलंय, निकालाकडे आम्ही आशादायी,” राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया
हेही वाचा…..“महाविकास आघाडीतील काही आमदार फडणवीस अन् शिंदेंच्या संपर्कात”,मंत्र्यांनी केला मोठा दावा
हेही वाचा…“अन् संजय राऊत पोहचले तुरूंगात, ‘या’ प्रकरणात हजर राहण्याचे होते आदेश”
हेही वाचा…“माझ्यावर आग ओकणारे आता…” ‘द केरला’ स्टोरी प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया