मुंबई : राज्यात एका बाजूला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर सगळ्याच जनतेचं लक्ष लागून राहिलं होतं. तर दुसऱ्या बाजूला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी महाराष्ट्राचा दौरा करत विरोधी पक्षातील नेत्यांच्या गाठी भेटी घेतल्या. यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…सत्तासंघर्ष निकाल..! “भगतसिंह कोश्यारींचे सर्व निर्णय चुकीचे, कोर्टाने राज्यपालांना जोरदार फटकारले”
आज देशात जे वातावरण तयार झालं आहे ते पाहता देशाची लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. संपुर्ण देशात जी परिस्थिती दिसत आहे, त्यात एकत्र काम केले तर लोक साथ देतील. असं शरद पवारांनी म्हटलं. त्यानंतर काल कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं आहे. आपल्या माहितीप्रमाणे कर्नाटकातील जनता भाजपला हाकलून धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करण्यासाठी पुढे जाईल. असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे, कोर्टाचा मोठा निकाल, निकालात शिंदेंना झटके, ठाकरेंना दिलासा
कर्नाटकपुरता मर्यादित न राहता देशाच्या मोठ्या भागात हीच स्थिती आहे. मात्र या परिस्थितीत यश मिळवायचे असेल तर एकत्र येऊन काम केले पाहिजे. मला आनंद आहे की नितीश कुमार आज ज्या गोष्ठींची गरज आहे ती पुर्ण करण्यासाठी मिशन हाती घेतले आहे. त्यांनी आपल्या सर्व सोबतींना आणि त्यांच्या मित्र पक्षातील नेत्यांशी संवाद साधला. आणि महाराष्ट्रातील देखील मित्र पक्ष त्याच मार्गाने पुढे जाण्याची आता गरज वाटू लागली आहे. असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…..एकनाथ शिंदेंना कोर्टाचा पहिला मोठा धक्का, भरत गोगावलेंचं प्रतोदपद बेकायदेशीर, सुप्रीम कोर्ट
दरम्यान, नितीश कुमार यांनी शरद पवार यांची भेट घेण्याअगोदर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्याठिकाणी उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार यांचं सत्कार केला. त्यानंतर नितीश कुमार शरद पवारांच्या भेटीला रवाना झाले. त्यासाठी त्यांच्यात पंधरा ते वीस मिनिटे चर्चा झाली.
READ ALSO :
हेही वाचा…“न्यायालयीन झगडे, कोर्ट कचेऱ्या वाचवण्याकरता नैतिकतेच्या आधारावर शिंदे-फडणवीस सरकारने त्वरीत राजीनामा द्यावा”
हेही वाचा…कोश्यारींना कोर्टाने फटकारले, भगतसिंह कोश्यारी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
हेही वाचा….“शिंदे सरकार वाचलं, हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो”, जंयत पाटलांनी घेतला शिंदेंचा चिमटा
हेही वाचा…महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल, उद्धव ठाकरेंच्या नैतिकतेचा फडणवीसांनी पाठ वाचला, ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“मी नैतिकता म्हणून राजीनामा दिला, आता मुख्यमंत्र्यांत थोडीशी नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा,” उद्धव ठाकरे