मुंबई : आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देतांना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटावर मोठे ताशेरे ओढले. परंतु १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या दालनात टाकला. यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देतात ? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे, कोर्टाचा मोठा निकाल, निकालात शिंदेंना झटके, ठाकरेंना दिलासा
ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे सरकार अस्तित्वात आलं, त्यानंतर जो घोडाबाजार झाला, हे पाहता सरकार बेकायदा, असंवैधानिक आहे. याकरत पुढची न्यायालयीन कारवाई निश्चितच केली जाईल. माझी या ठिकाणी मागणी आहे की इतकी गंभीर ताशेरे संवैधानिक पदावर बसलेल्या लोकांवर ओढले आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. न्यायालयीन झगडे, कोर्ट कचेऱ्या वाचवण्याकरता नैतिकतेच्या आधारावर शिंदे-फडणवीस सरकारने त्वरीत राजीनामा दिला पाहिजे आणि नवं सरकार महाराष्ट्रामध्ये गठन केलं पाहिजे. असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…..एकनाथ शिंदेंना कोर्टाचा पहिला मोठा धक्का, भरत गोगावलेंचं प्रतोदपद बेकायदेशीर, सुप्रीम कोर्ट
सगळं घेऊनही त्यांनी माझ्या पाठीत वार करावा आणि माझ्यावर अविश्वास आणावा हे मला मान्य नाही. विश्वासघात करणाऱ्यांकडून माझ्यावर अविश्वासदर्शक ठराव यावा हे मला मान्य आहे. माझ्या राजीनाम्याचा निर्णय हा नैतिकता समोर ठेवून घेतला होता. आताच्या मुख्यमंत्र्यांत थोडीशी नैतिकता असेल तर आता त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. कायद्यानुसार मी दिलेला राजीनामा चुकीचा ठरू शकतो. पण नैतिकतेचा विचार करता ज्या लोकांना माझ्या पक्षानं सर्वकाही दिलं, त्यांनी गद्दारी केली आणि मग त्यांनी माझ्यावर अविश्वास आणला तर त्याचा मी सामना का आणि कसा करू? महाराष्ट्रात तर आता सरकारच नाहीये. असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कोश्यारींना कोर्टाने फटकारले, भगतसिंह कोश्यारी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
हेही वाचा….“शिंदे सरकार वाचलं, हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो”, जंयत पाटलांनी घेतला शिंदेंचा चिमटा
हेही वाचा…महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल, उद्धव ठाकरेंच्या नैतिकतेचा फडणवीसांनी पाठ वाचला, ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“मी नैतिकता म्हणून राजीनामा दिला, आता मुख्यमंत्र्यांत थोडीशी नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा,” उद्धव ठाकरे
हेही वाचा…सत्तासंघर्ष निकाल..! “भगतसिंह कोश्यारींचे सर्व निर्णय चुकीचे, कोर्टाने राज्यपालांना जोरदार फटकारले”