मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश धंनजंय चंद्रचुड यांनी कोर्टात वाचून दाखवला. या प्रकरणातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे कोर्टाने सोपवला. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अशी मागणी केली आहे.
हेही वाचा….“शिंदे सरकार वाचलं, हा सत्तेच्या भोवती गोळा झालेल्यांचा क्षणिक आनंद राहू शकतो”, जंयत पाटलांनी घेतला शिंदेंचा चिमटा
मला वाटत नाही की विधानसभा अध्यक्ष आता निर्णय घेण्यात वेळकाढूपणा करतील. कारण कशा पद्धतीने निर्णय घ्यायचाच, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत आणि जर त्यानुसार नाही झालं. तर पुन्हा न्यायालयाकडे दाद मागण्याचा पर्याय आहेच. असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल, उद्धव ठाकरेंच्या नैतिकतेचा फडणवीसांनी पाठ वाचला, ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
कोणत्या गटाला राजकीय पक्ष म्हणावं. यासंदर्भातला निर्णयही विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असं या निकालात नमुद केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालयाने दहाव्या परिशिष्ठाचा जो अर्थ लावला आहे. त्या आधारावर येणाऱ्या काळात चौकशी करू. लवकरात लवकर हा निर्णय घेण्याचा आपण प्रयत्न करू. पण आधी राजकीय पक्ष नेमका कोणता आहे. याचा निर्णय घ्यायला सांगितलं आहे. त्यानंतर या प्रत्येक याचिकेवर आपण सुनावणी घेऊ. सगळ्यांना म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल. नियमांचं पालन करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. असं विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा….“माझ्या पुस्तकात काही गोष्टींचा उल्लेख केल्याने मित्र नाराज झालेत”, शरद पवारांचं वक्तव्य
हेही वाचा…आता ठरलंच..! शिंदे- भाजप युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा संपु्र्ण विस्तार होणार ?
हेही वाचा…“लोकशाही वाचवण्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज”, शरद पवार
हेही वाचा…“न्यायालयीन झगडे, कोर्ट कचेऱ्या वाचवण्याकरता नैतिकतेच्या आधारावर शिंदे-फडणवीस सरकारने त्वरीत राजीनामा द्यावा”
हेही वाचा…कोश्यारींना कोर्टाने फटकारले, भगतसिंह कोश्यारी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले