मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाला एक वेगळी दिशा प्राप्त झाली आहे. सुरूवातीला भाजप-शिवसेना युती होती, परंतु शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससोबत युती करत सरकार स्थापन केलं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेविरोधात बंड करत पुन्हा भाजपशी जुळवून सत्ता स्थापन केली. या सर्व राजकीय पेचामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य करत राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा…“सगळ्यांना म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल”, निकालानंतर विधानसभा अध्यक्षांची प्रतिक्रिया
महापालिकेच्या निवडणुका राष्ट्रवादी काॅंग्रेसमुळे थांबल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना झाली. ही प्रभाग रचना शिंदे आणि फडणवीस सरकारने बदलली. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राष्ट्रवादीने याचिका मागे घ्यावी लगेच निवडणुका लागतील. असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा….“माझ्या पुस्तकात काही गोष्टींचा उल्लेख केल्याने मित्र नाराज झालेत”, शरद पवारांचं वक्तव्य
राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रभाग रचनावरून वाद सुरू आहे. यातच ओबीसी समाजाचं १० टक्के राजकीय आरक्षणाला देखील न्यायालयात स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षाभरापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत. तसेच प्रभाग रचनेवरून महाविकास आघाडीने कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्याचीही सुनावणी सध्या कोर्टात सुरू आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कोश्यारी गेले, बैस आले, पण, त्या ‘१२’ आमदारांची सुनावणी पुन्हा लांबणीवर, कोर्टाचा मोठा निर्णय
हेही वाचा…“निकाल ठाकरेंच्या विरोधात, पण अजित पवारांनी पटोलेंवर हात धुवून घेतले”, एकच चर्चा
हेही वाचा…जंयत पाटलांना इडीची नोटीस, राज ठाकरेंनाही त्याच कंपनीसंबंधी आली होती नोटीस, ‘ती’ कंपनी कोणती ?
हेही वाचा…“निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा, पुण्यातील ‘ही’ नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत
हेही वाचा…शिवसेना नेमकी कुणाची? कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे टाकला चेंडू, काय घडणार, काय होणार ?