मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल देतांना सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील प्रतोदपद बेकायदेशीर असल्याचं मत व्यक्त केले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून आमदार भरत गोगावले यांनी प्रतोदपदी करण्यात आलेली निवड ही बेकायदेशीर असून त्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर भाष्य केले आहे.
हेही वाचा…आता ठरलंच..! शिंदे- भाजप युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा संपु्र्ण विस्तार होणार ?
प्रतोद नेमण्यापासून अनेक गोष्टींना सर्वोच्च न्यायालयाने चुकीचं म्हटलं. मात्र, पुढे काय झालं? यामध्ये एक तर आमचे त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता देण्यात आला. राजीनामा दिल्यावर माहिती देण्यात आली. एक तर तो राजीनामा द्यायला नको होता. राजीनामा दिल्यानंतर लगेच पुन्हा विधानसभा अध्यक्षांची निवडणुक घेऊन तो विषय संपवायला हवा होता. तेही दुर्दैवाने आमच्या सगळ्यांकडून झालं नाही. मी यासाठी एकट्याला दोषी धरत नाही. आमच्या महाविकास आघाडीकडून तो विषय तातडीने घ्यायला लागला असता तर तिथं विधानसभा अध्यक्ष बसले असते आणि त्यांच्याअधिपत्याखाली या सर्व गोष्टी झाल्या असत्या. मोठा काळ विधानसभेचे उपाध्यक्ष काम पाहत होते. असंही अजित पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“लोकशाही वाचवण्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज”, शरद पवार
पुढे बोलतांना ते म्हणाले की, अध्यक्षांची जागा रिक्त राहिली होती. या घटना घडल्यानंतर शिंदे-फडणवीसांनी पहिल्यांदा बहुमताच्या जोरावर ती जागा भरली. जर त्या जागेवर महाविकास आघआडीचे नेते असते तर त्यांनी या १६ आमदारांनी तेव्हाच अपात्र ठरवलं असतं. असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“न्यायालयीन झगडे, कोर्ट कचेऱ्या वाचवण्याकरता नैतिकतेच्या आधारावर शिंदे-फडणवीस सरकारने त्वरीत राजीनामा द्यावा”
यातच आता मी नैतिकतेवर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आता नैतिकेच्या आधारे राजीनामा द्यावा. अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडून केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांना विचारले असता. ते म्हणाले की, नैतिकतेवर शिंदे-फडणवीस राजीनामा देतील हे स्वप्नही पाहू नका. असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जंयत पाटलांना इडीची नोटीस, राज ठाकरेंनाही त्याच कंपनीसंबंधी आली होती नोटीस, ‘ती’ कंपनी कोणती ?
हेही वाचा…“निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा, पुण्यातील ‘ही’ नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत
हेही वाचा…शिवसेना नेमकी कुणाची? कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे टाकला चेंडू, काय घडणार, काय होणार ?
हेही वाचा…“सगळ्यांना म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल”, निकालानंतर विधानसभा अध्यक्षांची प्रतिक्रिया
हेही वाचा….“माझ्या पुस्तकात काही गोष्टींचा उल्लेख केल्याने मित्र नाराज झालेत”, शरद पवारांचं वक्तव्य