मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषद नियुक्त १२ आमदारांचं प्रकरण पुन्हा लांबणीवर गेलं आहे. आज राज्यपाल नियुक्त १२ आमदाराचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी ठेवण्यात येणार होतं. परंतु आज न्यायालयाच्या कामकाजात हे प्रकरण घेण्यात आलं नसून हे प्रकरण आता दीड महिना पुढे ढकलण्यात आलं आहे. त्यामुळे याप्रकरणाबाबत पुढील सुनावणी येत्या ४ जुलै रोजी होणार आहे.
हेही वाचा….“माझ्या पुस्तकात काही गोष्टींचा उल्लेख केल्याने मित्र नाराज झालेत”, शरद पवारांचं वक्तव्य
महाविकास आघाडी सरकार असतांना राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न चर्चेत आला. महाविकास आघाडी सरकारने तेव्हाचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे १२ नियुक्त आमदारांची नावे पाठविली होती. परंतु राज्यपालांनी याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यानंतर महाविकास आघाडी विरूद्ध राज्यपाल असा राजकीय संघर्ष पेटला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलं. अन् त्यावर कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर आता पुढची सुनावणी येत्या ४ जुलै रोजी होणार आहे.
हेही वाचा…आता ठरलंच..! शिंदे- भाजप युती सरकारच्या मंत्रिमंडळाचा संपु्र्ण विस्तार होणार ?
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने दिलेली राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलली. त्यानंतर सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती यादी पुन्हा राज्यपालांकडे पाठवण्यात आली. परंतु त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यातच आता आमदारांचं संख्याबळ पाहता भाजपला १२ पैकी ८ तर शिंदे गटाला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे १२ आमदारांची प्रलंबित नियुक्ती आणखीच लांबणीवर गेली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“निकाल ठाकरेंच्या विरोधात, पण अजित पवारांनी पटोलेंवर हात धुवून घेतले”, एकच चर्चा
हेही वाचा…जंयत पाटलांना इडीची नोटीस, राज ठाकरेंनाही त्याच कंपनीसंबंधी आली होती नोटीस, ‘ती’ कंपनी कोणती ?
हेही वाचा…“निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा, पुण्यातील ‘ही’ नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत
हेही वाचा…शिवसेना नेमकी कुणाची? कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे टाकला चेंडू, काय घडणार, काय होणार ?
हेही वाचा…“सगळ्यांना म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल”, निकालानंतर विधानसभा अध्यक्षांची प्रतिक्रिया