मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भावी पंतप्रधान म्हणून विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने डिवचण्यात येतंय. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून शरद पवारांनी राज्यात तसेच केंद्रात अनेक महत्वाची पदं भुषविलीत. परंतु त्यांना आजपर्यंत पंतप्रधान होता आलं नाही. यातच शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाहीत. अन् जर परिस्थिती बदलली तर ते कसे पंतप्रधान होऊ शकतात. याबाबत ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी मोठं भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“दादा तुम्ही आमचे, तुम्ही आम्हाला पारखं करू नये”, अजित पवारांनी सुनावल्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत, कारण दिल्लीतील काॅंग्रेसमधील चौकडी कामाला लागायची आणि दिल्लीतून त्यांचं नाव कापण्यात यायचं. नरसिंह राव आणि शरद पवार यांच्यात पक्षांतर्गत निवडणुक झाली. तेव्हा मी माझं मत पवारांना दिलं होतं. मात्र दिल्लीतील चौकडीमुळे शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत. असं यशवंतराव गडाख यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंसमोर रडल्या असत्या तर योग्य ठरलं असतं”, अजित पवारांचा पलटवार
तर ईडीच्या भीतीने लोक आज सोडून चालले आहेत. पण त्यांनी ठामपणे सांगितलं आहे की तुम्ही कुठेही जा, मी माझा पक्ष वाढवणार. याही वयात मी संपुर्ण महाराष्ट्र फिरणार. लोकांमध्ये जाणार. ज्यांना जायचं आहे, त्यांनी जावं. माझी कोणावर आडकाठी नाही. ही हिमंत ८२-८३ वयाच्या माणसात आहे. असा माणुस होणे नाही. हा शेवटचा माणुस आहे. कुठेही काही नसताना आज दिल्लीत सर्वपक्षीय नेते त्यांना मानतात. काय सांगावं कदाचित होणाऱ्या निवडणुकीनंतर जर परिस्थिती बदलली तर ते पंतप्रधानही होतील. कारण पंतप्रधानपदी असा माणुस मिळणं हे अवघड आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…१०० कोटी प्रकरणातील परमबीर सिंहंचं निलंबन मागे घेण्याचं फडणवीसांनी सांगितलं कारण
हेही वाचा…“..तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही अडचणीत येऊ शकतो,” संजय राऊतांच्या वक्तव्याने एकच चर्चा*
हेही वाचा…“…तर मोदींनी हे करावे, म्हणजे ईडीचा वेळ अन् देशाचा खर्च वाचेल”
हेही वाचा…“ज्यांना १७ दारं फिरूनही कुत्र विचारत नाही, त्यांनी नैतिकता शिकवू नये,” दानवेंचा राणेंना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…100 कोटी वसुली प्रकरण..! शिंदे सरकारचा ‘परमबीर सिंह’ ला मोठा दिलासा, आघाडीचा तो निर्णय मागे