पुणे : पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे भरदिवसा हत्या झाल्याने एकच खबळबळ उडाली आहे. जनसेना विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोरच प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने एकच हळहळ व्यक्त केली आहे. याच प्रकरणी आता मावळचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा…“…तर मोदींनी हे करावे, म्हणजे ईडीचा वेळ अन् देशाचा खर्च वाचेल”
काल अज्ञात व्यक्तींनी जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी मयत किशोर आवारे यांच्या मातोश्री सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आमदार सुनील शेळके, भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा…“ज्यांना १७ दारं फिरूनही कुत्र विचारत नाही, त्यांनी नैतिकता शिकवू नये,” दानवेंचा राणेंना जोरदार प्रत्युत्तर
किशोर आवारे हे जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून तळेगावच्या राजकारणात सक्रिय होते. नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी समितीचे नगरसेवक देखील निवडून आणले होते. राजकारणात त्यांचे वाढते प्रस्थ अडचणीचे ठरत असल्याने आमदार सुनील शेळके यांच्यासह सुधाकर शेळके यांच्याकडून वारंवार त्रास दिला होता. किशोर आवारे यांनी या लोकांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. असं सुलोचना आवारे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…काॅंग्रेसचे दोन्ही नेते आपांसात भिडले, पटोले- वडेट्टीवार मधील ‘ते’ प्रकरण कारणीभूत
हेही वाचा…समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचे छापे, आघाडीच्या काळातील ‘दोन’ प्रकरणात आज मोठी घडामोड
हेही वाचा…“तर शरद पवार पंतप्रधान झाले असते, आजही परिस्थिती बदलली तर ते होऊ शकतात, “
हेही वाचा…१०० कोटी प्रकरणातील परमबीर सिंहंचं निलंबन मागे घेण्याचं फडणवीसांनी सांगितलं कारण
हेही वाचा…“..तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही अडचणीत येऊ शकतो,” संजय राऊतांच्या वक्तव्याने एकच चर्चा*