मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचारानंतरही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेस आघाडीवर असून काॅंग्रेसने या निवडणुकीत बहूमताच्या दिशेने आगेकुच केली आहे. त्यामुळे हा भाजपला मोठा धक्का असून कर्नाटक राज्य भाजपच्या हातून सुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“..तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही अडचणीत येऊ शकतो,” संजय राऊतांच्या वक्तव्याने एकच चर्चा*
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत २२४ पैकी २२३ विधानसभा मतदारसंघांपैकी काॅंग्रेस ११४ जागांवर आघाडीवर असून भाजप ७३ आणि जेडीएस ३० जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे या निवडणुकीत काॅंग्रेसकडून सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात येत असून काॅंग्रेसच्या उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी हालवण्यात येत असल्याचीही माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“…तर मोदींनी हे करावे, म्हणजे ईडीचा वेळ अन् देशाचा खर्च वाचेल”
दरम्यान, कर्नाटकात सर्वपक्षीय मोठे नेते आपापल्या मतदार संघात आघाडीवर आहेत. यात सिद्धरामय्या, डिके शिवकुमार, एमबी पाटील, बसवराज बोम्मई आणि एचयुडी कुमारस्वारी आपापल्य मतदारसंघात आघाडीवर आहेत. यातच कर्नाटक विधानसभेतील मागच्या सरकारच्या काळातील भाजपचे ११ मंत्री पिछाडीवर गेले आहेत.
हेही वाचा…“ज्यांना १७ दारं फिरूनही कुत्र विचारत नाही, त्यांनी नैतिकता शिकवू नये,” दानवेंचा राणेंना जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकच्या जनतेने मोदी-शाहांना झिडकारलं आहे, हे मान्य करा. अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील भाजप नेते गेले, ते जिथे जिथे गेले तिथे तिथे भाजपचा मोठा पराभव झाला. महाराष्ट्रातून भाजप नेत्यंची मोठी टोळी, काॅंग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कर्नाटकात गेली. त्या प्रत्येक ठिकाणी भाजपचा दारून पराभव झाला. कर्नाटकातील निकाल २०२४ साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा असेल. २०२४ मध्ये असाल निकाल लागेल. ही एक लोकभावना आहे. देशाची मन की बात कर्नाटकातून बाहेर पडली अस खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यात भरदिवसा हत्या..! राष्ट्रवादीच्या आमदारावर गुन्हा दाखल, परिसरात हळहळ व्यक्त
हेही वाचा…काॅंग्रेसचे दोन्ही नेते आपांसात भिडले, पटोले- वडेट्टीवार मधील ‘ते’ प्रकरण कारणीभूत
हेही वाचा…समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचे छापे, आघाडीच्या काळातील ‘दोन’ प्रकरणात आज मोठी घडामोड
हेही वाचा…“तर शरद पवार पंतप्रधान झाले असते, आजही परिस्थिती बदलली तर ते होऊ शकतात, “
हेही वाचा…१०० कोटी प्रकरणातील परमबीर सिंहंचं निलंबन मागे घेण्याचं फडणवीसांनी सांगितलं कारण