नागपूर : राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदावरून, सध्या राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपने वातावरण चांगलेच तापवलेले आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांमध्येच अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून काँग्रेसकडून कोण बसवणार यावरून मतभेद आहेत, तर दुसरीकडे या निवडणुकीत विरोधकांनीही उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस व अमित शहांची भेट म्हणजे २०२४ची रणनीती; रावसाहेब दानवेंनी सांगितले रहस्य
दरम्यान, ५ आणि ६ जुलैला होणाऱ्या या अधिवेशनात, अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलं असून, आज नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी, “विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घोषित होऊ द्या. राज्य सरकारचा निर्णय समोर आल्यावर, भाजप रणनिती जाहीर करेल. जोवर त्यांचा अध्यक्षपदाचा निर्णय होत नाही, तोवर यावर आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही,” असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात तब्बल दोन तास गुप्त बैठक
तसेच, मोदी सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील, सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका, न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. यावर बोलताना, “मराठा आरक्षणावर पुढील कार्यवाही करण्यासाठी, आघाडी सरकारनेच गठीत केलेल्या न्या. भोसले समितीने, फेरविचार याचिकेला मर्यादा असतात, हे त्यांच्या अहवालात नमूद केले होते. तसेच, यासंबंधातील पुढील कार्यवाही काय असली पाहिजे, हेसुद्धा त्यांनी तपशीलवार नमूद केले होते. मात्र, असे असतानाही राज्य सरकार वेळकाढू धोरण अवलंबत आहे. आता कोणताही शॉर्टकट उरलेला नाही. त्यामुळे न्या. भोसले समितीच्या शिफारसींनी दाखवलेल्या मार्गानेच सरकारने चाललं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आमची अपेक्षा आणि मागणी आहे”, असं त्यांनी सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मंत्रिपद मिळणार का?; फडणवीस म्हणतात…
यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार का यावर बोलताना, “माझी दिल्लीत जाण्याची शक्यता नाही. काहींना वाटतं, हा दिल्लीला गेला, तर बला टळेल पण तसं काही होणार नाही. मोदीजी जो आदेश देतील, तो आमच्या सर्वांसाठी शिरोधार्ह असतो. पण, ज्याला भाजपचं, महाराष्ट्राचं राजकारण कळतं, त्याला हेही कळून येईल की, मी महाराष्ट्रातून कुठेही जाण्याची ही वेळ नाही,” अशी खोचक टीका त्यांनी हितचिंतकांवर केली आहे.
Read Also :
- “केंद्राची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळणे; हा मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला मोठा धक्का”
- “एकाच का? ४३ कारखान्यांवर कारवाई केलीच पाहिजे”- राजू शेट्टी
- अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
- “कोणी कितीही आपटली, तरी अध्यक्षपदी महाविकास आघाडीचाच उमेदवार येणार”
- अधिवेशनाचा कालावधी वाढवणार नाही; राज्यपाल कोश्यारींच्या पत्राला ठाकरेंचे उत्तर