मुंबई : नाना पटोले यांच्यानंतर रिक्त झालेले विधानसभा अध्यक्षपद, इतक्या अधिवेशनानंतरही रिक्त ठेवणे हे असंविधानिक असल्याचे म्हणत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हे पद या पावसाळी अधिवेशनात तातडीने निवडले जावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर, राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस स्वबळावर लढणार; भाजप कोंडी करणार?
या पार्श्वभूमीवर, अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या गटनेत्यांची बैठक बुधवारी रात्री उशीरा कोणत्याही निर्णयाविना संपली. आज गुरुवारी पुन्हा सर्व नेते भेटले. अध्यक्ष निवड करायची असेल, तर त्यासंबंधीतील पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गुरुवारी संध्याकाळपयर्यंत द्यावे लागणार होते. मात्र, अजूनही अध्यक्ष पदावरुन आघाडीत संभ्रम कायम आहे.
विधानसभेच्या अध्यक्षपद निवडीवरुन महाविकास आघाडीत संभ्रम कायम?
काँग्रेसच्या वाट्याला असलेलं विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्यात चुरस आहे. मात्र, शिवसेनेने पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली आहे, तर थोपटे यांच्या नावाला त्यांचा विरोध आहे, तर राष्ट्रवादीने चव्हाणांच्या नावाला विरोध केला असून, थोपटे यांनाच हे पद दिले जावे, म्हणून राष्ट्रवादी आग्रही आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.
Read Also :
- “चंद्रकांतदादा महसूलमंत्री होते, तेव्हा त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते”
- मोठी बातमी! ईडीने केली अजित पवारांच्या निकटवर्तीयावर मोठी कारवाई
- “कुणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार, मात्र…” पडळकरांवरील हल्ल्याप्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
- वर्षावरच्या ‘त्या’ बैठकीत काय झाले? स्वतः शरद पवारांनी केला मोठा खुलासा
- “जास्त दिवस चालणार नाही, हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल”