मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इस्त्राईल आणि हमास युद्धावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून शरद पवार यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आता याच पार्श्वभूमीवर शरद पवारांचा दहशतवाद्यांना पाठींबा आहे का ? याचा खुलासा करावा. असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी शरद पवारांवर जोरदार घणाघात देखील केला आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘त्या’ चार कार्यकर्त्यांना अखेर न्याय मिळाला, तडीपारचा आदेश कोर्टाने केला रद्द
दहशतवाद कुणा एका व्यक्ती किंवा देशाविरुध्द नसून तो माणुसकीच्या विरोधात असतो ही देशाची भूमिका आदरणीय मोदीजी जी-20, संयुक्त राष्ट्रसंघा सारख्या व्यासपीठांवर मांडत आले आहेत. या धोरणाप्रमाणे त्यांनी दहशतवादी हल्ल्याविरोधी देशाची भूमिका त्यांनी मांडली. पॅलेस्टाईनच्या विरोधात नव्हे तर दहशतवादाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. देशाच्या आजवरच्या धोरणाला धरुनच माननीय मोदीजींनी वक्तव्य केले. दहशतवाद विरोधी भूमिका घेणे चुकीचे आहे असे पवार साहेबांना म्हणावयाचे आहे काय? पॅलेस्टिनी आणि दहशतवादी एकच आहेत असे पवार साहेबांना म्हणावयाचे आहे काय ? असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
हेही वाचा…चिठ्ठी लिहून मराठा बांधवाने संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहिली ‘मराठा आरक्षणा’ची तारिख
पुढे बोलतांना ते म्हणाले की, पवार साहेब देशाचे संरक्षण, कृषि मंत्री व महाराष्ट्राचे अनेक वेळा मुख्यमंत्री होते. मुंबईमध्ये 1993 साली झालेल्या बॉम्ब स्फोटांच्या वेळी ते मुख्यमंत्री होते. 12 बॉम्ब स्फोट झाले असताना त्यांनी तेरावा बॉम्ब स्फोट मशिदीत झाल्याची खोटी माहिती देऊन दहशतवाद्यांना वाचवायचाच प्रयत्न केला नव्हता काय ? तुष्टीकरणाच्या धोरणामुळे देशावर आजवर अनेक संकटे आली. आता तरी पवार साहेब तुष्टीकरण सोडून देश प्रथम ही भूमिका घेणार आहेत काय ? दहशतवादाने भाजून निघालेल्या महाराष्ट्रातील जनतेसमोर आता ते कोणता खुलासा करणार आहेत ? असा सवालही त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“कुठलाच ९६ कुळी मराठा कुणबी दाखला घेणार नाही”, नारायण राणेंच्या विधानानंतर वाद होण्याची शक्यता
हेही वाचा…ड्रग्ज प्रकरण..! “तुम्ही कुणाची चौकशी करणार, अगोदर तुम्हीच याचं उत्तर द्या, ?” अन् सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पारा चढला
हेही वाचा…बावनकुळेंचं वक्तव्य, अन् दुसरीकडे काका-पुतण्यात झाली लढाई, पाहा नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…बारामती अॅंग्रो कंपनीचा लढा रोहित पवारांनी जिंकला, प्रदूण नियंत्रण मंडळाचे आदेश कोर्टाकडून रद्द
हेही वाचा…“आघाडीत वादावादी होईल, घासाघिस होईल, पण उमेदवार देऊ,” पृथ्वीराज चव्हाणांचं लोकसभेबाबत मोठं विधान