मुंबई : राज्यात काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात २२ ऑक्टोंबर पर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचं सांगितलं आहे. तर उद्या जुन्नर मध्ये मनोज जरांगे पाटलांची जाहीर सभा होत आहे. त्याआधीच कुठलाच ९६ कुळी मराठा कुणबी दाखला घेणार नाही. असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…चिठ्ठी लिहून मराठा बांधवाने संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहिली ‘मराठा आरक्षणा’ची तारिख
नारायण राणे यांनी म्हटले की, मराठा आणि कुणबी हे एकच नसून यात फरक आहे. मनोज जरांगे पाटील सांगताहेत. ते खरं नाही आहे. त्यांनी जातीचा अभ्यास करावा. त्यांनी घटनेचा अभ्यास करावा. मी मराठा आहे. आरक्षण कधीच घेणार नाही. अस नारायण राणेंनी ठणकावून सांगितलं आहे. तसेच कुठलाच मराठा कुणबीचं प्रमाणपत्र घेणार नाही. असं देखील नारायण राणे म्हणाले.
हेही वाचा…फडणवीसांच्या ‘महायुतीचा घटक पक्ष’ शरद पवारांच्या गळाला ? दिल्लीत मोठी खलबत्तं
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवर बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याची झळ आता आमदार, खासदारांना देखील मोठ्या प्रमाणात बसत असल्याचं दिसून आलं आहे. पिंपळनेर कारखाना कार्यक्रमासाठी अजित पवारांना येण्यास मराठा बांधवांनी बंदी घातली असून आता मराठा आंदोलकांचा रोष अजित पवारांवर दिसून येत आहे. तर शरद पवारांचं माढा लोकसभा मतदारसंघात ग्रॅंड वेलकम होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ड्रग्ज प्रकरण..! “तुम्ही कुणाची चौकशी करणार, अगोदर तुम्हीच याचं उत्तर द्या, ?” अन् सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पारा चढला
हेही वाचा…बावनकुळेंचं वक्तव्य, अन् दुसरीकडे काका-पुतण्यात झाली लढाई, पाहा नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…बारामती अॅंग्रो कंपनीचा लढा रोहित पवारांनी जिंकला, प्रदूण नियंत्रण मंडळाचे आदेश कोर्टाकडून रद्द
हेही वाचा…“आघाडीत वादावादी होईल, घासाघिस होईल, पण उमेदवार देऊ,” पृथ्वीराज चव्हाणांचं लोकसभेबाबत मोठं विधान
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘त्या’ चार कार्यकर्त्यांना अखेर न्याय मिळाला, तडीपारचा आदेश कोर्टाने केला रद्द