पुणे : सध्या राजकीय सुडापोटी विरोधकांवर कारवाया केल्या जात आहेत आणि ईडी हा भाजपला एक सहकारी पक्ष राहिलेला आहे. ईडी कोणावर येणार आहे ? कधी कारवाई करणार आहे ? हे भाजपच्या नेत्यांना माहिती असते. त्यासाठी ते धमक्या देतात. पुढच्या काळात कोणावर कारवाई करायची ? याचे आदेश भाजपच्या मंडळातून निघतात की काय अशी शंका यावी असे वातावरण त्याठिकाणी आहे. अशी टिका शरद पवार यांनी भाजपवर केली आहे. आज मोतीबाग येथे पवारांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…लोकसभेला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे करणार हजारो मराठा उमेदवार ; पुणे जिल्ह्यात ठराव मंजूर
आयोगाचा सतत गैरवापर करून एक प्रकारचे दहशत निर्माण करायचे आणि वातावरण निर्मिती करायची सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही उमेदवार निवडलेत किंवा निवडण्याच्या प्रक्रियेत आहोत. त्यांच्याकडे जाऊन ईडीची चौकशी करणे. कळत नकळत विरोधी पक्षाकडून तुम्ही निवडणुकीला उभे राहू नका अशा प्रकारची धमकी देण्याची खबरदारी आजही घेतली जाते. ती चिंताजनक गोष्ट असल्याचेही पवारांनी सांगितले.
हेही वाचा…शिवसेना पित्रा-पुत्रात होणार लोकसभेचा सामना, ठाकरेंनी जाहीर केली ‘या’ नेत्याची उमेदवारी
अनेक लोकांना सध्याचे राजकीय वातावरण जे चालू आहे ते योग्य वाटत नाही. आमच्यापासून दुर जाण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे. ते त्यांच्या निर्णयाशी कायम आहेत. पण अस्वस्थ असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच ४०० पार थोडाच अंक आहे. ५४३ पार्लमेंटच्या जागा आहेत आणि ते ४०० पार सांगत आहेत. भाजपने ५४३ सांगायला हव्यात असा टोलाही शरद पवारांनी भाजपला लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…निवडणुकीपुर्वी जळगावात भाजपला मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता ठाकरे गटात दाखल
हेही वाचा.तटकरे, धनंज मुंडे, यांच्यासह राष्ट्रवादीचा एक गट भाजपात प्रवेश करणार, अजित पवारांना मोठा धक्का ?
हेही वाचा..पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्रांचा प्राधिकरण परतावा प्रश्न अखेर सुटला, महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश
हेही वाचा…“लंकेसाहेब तुमच्या खांद्यावर बंदुक ठेवली जातेय”, शरद पवार गटात पक्ष प्रवेशावर अजित पवार गटाची प्रतिक्रिया
हेही वाचा..शिंदेंच्या आणखी एका खासदाराचा पत्ता कट होणार ; नाशिकमधून शांतिगिरी महाराज लोकसभेच्या मैदानात ?