मुंबई : बीग बॉस विजेता एल्विश यादववर रेव्ह पार्टी आणि इतर गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. यानंतर एल्विश यादव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर्षा बंगल्यावरील फोटो व्हायरल होत आहे. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे .
हेही वाचा…“मराठा आणि कुणबी एकच, त्यासंदर्भात ब्रिटिशकालीन पुरावे”, प्रवीण गायकवाडांचं मोठं विधान
अजून एका ड्रग्स माफियाचा घटनाबाह्य सरकारशी संबंध आला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा गोष्टी सरकारकडून वारंवार होत आहेत. मग कधी कोणा मंत्र्याची ड्रग्स माफियाशी मैत्री असते. तर कधी ड्रग्स माफिया वर्षा बंगल्यावर दिसतात. ह्या घटनाबाह्य सरकारचं काय होणार ते कोणालाच माहित नाही. पण हे महाराष्ट्राची बदनामी करत आहेत एवढं मात्र नक्की. असं शिवसेना ठाकरे गटाने ट्विट केलं आहे.
हेही वाचा…“मराठा समाजाला आरक्षण दिल्यास काय होईल?” वकिल गुणरत्ने सदावर्तेंचा मराठा आरक्षणाला विरोध का ?
दरम्यान, वर्षा बंगल्यावर येणाऱ्या प्रत्येक माणसाची माहिती नसते. आमदार, खासदार मंत्री यांच्यासोबत अनेक लोक येतात, जातात त्याचं एव्हढं भांडवल करण्याची काही गरज नाही. सचिन वाझे मातोश्री आणि वर्षावर का जायचे? याचा खुलासा संजय राऊतांनी करावा. असा टोलाही विखे पाटलांनी राऊतांना लगावला. पुढे बोलतांना ते म्हणाले की, सचिन वाझेंच्या खंडणी प्रकरणावर संजय राऊत गप्प का आहेत ? एल्विश यादव दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. अशी टिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय.
अजून एका ड्रग्स माफियाचा घटनाबाह्य सरकारशी संबंध आला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा गोष्टी सरकारकडून वारंवार होत आहेत. मग कधी कोणा मंत्र्याची ड्रग्स माफियाशी मैत्री असते. तर कधी ड्रग्स माफिया वर्षा बंगल्यावर दिसतात. ह्या घटनाबाह्य सरकारचं काय होणार ते कोणालाच माहित नाही. पण हे… pic.twitter.com/aFmd3os1hQ
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 4, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“सचिन वाझे मातोश्री आणि वर्षावर का जायचे? भाजपच्या मंत्र्याने राऊतांना विचारला खोचक सवाल
हेही वाचा…“अजित दादांच्या दबावामुळेच कार्यक्रमाचं निमंत्रण रद्द, मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप”
हेही वाचा…“काहीच देणं घेणं नसल्यासारखं आपण मात्र बद्रीनाथच्या दर्शनाला निघून जायचं”, शिंदे गटाची ठाकरेंवर टिका
हेही वाचा…अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस आमनेसामने, बारामतीच्या ‘या’ गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या मतदान
हेही वाचा…उद्या तब्बल २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान, अनेक पक्षाच्या नेत्यांचं भवितव्य टांगणीला