मुंबई : मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यासंदर्भात ब्रिटिशकालीन पुरावे आहेत, त्यावेळी आरक्षण नव्हते. देशात ओबीसी ५२ टक्के असताना त्यांना २७ टक्के आरक्षण मिळते, त्यात मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नाही. ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देणे राजकीय अडचण आहे. सर्वच पक्षांना ते अडचणीचं असल्याचं संभाजी ब्रिगडेचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“23 मार्च १९८३ रोजी शरद पवारांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला,” शरद पवार मराठा नाही तर ओबीसी, कुणी केले गंभीर आरोप?
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात लाठीचार्ज झाल्यामुळे त्यांना सहानुभूती मिळाली आहे. अस्वस्थ मराठा तरूम बाहेर पडला आहे. मी मराठा आरक्षणाचा समर्थक आहे मात्र आता मराठा तरूणांनी मराठा आरक्षणाची वाट न पाहता जिकडे नोकरी मिळेल तिकडे नोकरी केली पाहिजे. असं मत देखील प्रविण गायकवाड यांनी मांडले आहे.
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी मान्य, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने सोपवला जीआर
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांना २ जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाच्या विरोधात वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर लोकशाहीचा डेडएन्ड होईल. अशी शक्यता गुणरत्ने सदावर्ते यांनी वर्तवली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा समाजाला आरक्षण दिल्यास काय होईल?” वकिल गुणरत्ने सदावर्तेंचा मराठा आरक्षणाला विरोध का ?
हेही वाचा…काकाची पुतण्याच्या मतदारसंघात एंन्ट्री..! राज ठाकरे वरळी मतदारसंघात दाखल
हेही वाचा…एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये निवडणुक लढविणार, ‘या’ माजी मंत्र्याला विधानसभेचं दिलं तिकीट
हेही वाचा…“भाजपचे नेते मोहित कंबोजला कोर्टाचा मोठा दणका, सुषमा अंधारेंनी फडणवीसांचं नाव घेऊन डिवचलं”
हेही वाचा…“जनतेशी नाळ जोडलेला आमदार भाजपने गमावला, आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन”