मुंबई : गेल्या मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाचं तापला गेलाय. यातच आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं आहे. याच दरम्यान मराठा आंदोलकांकडून काही ठिकाणी हिसंक घटना घडवल्या. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. यातच आता मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यातच आता प्रसिद्ध उद्योजक आणि प्रो. नामदेव जाधव यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर आरोप लावले आहेत.
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश, कारवाई करण्यास वेग वाढला
मंडल आयोगाच्या वेळी मंडल आयोगापेक्षाही मोठा घोटाळा महाराष्ट्रात २३ मार्च १९८३ रोजी झाला आहे. या दिवसाकडे मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा काळा दिवस तसेच मराठ्यांचा गळा घोटणारा दिवस म्हणून पाहिला जात आहे. जालियानवाला बागमध्ये जनरल डायरने हत्याकांडापेक्षा २३ मार्च १९८३ रोजी शरद पवार यांनी कांड केला आहे. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ओबीसी समाजाच्या ११ टक्के आरक्षणामध्ये लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी अशा तीन जातींचा फक्त एक सहीना समावेश केला होता. असा आरोप नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्यावर केलाय.
हेही वाचा..“आमच्यावरील हल्ला काही समाजकंटकांनी केला, लवकरच पुरावे देणार”, संदीप क्षीरसागर यांनी दिला इशारा
त्यावेळी ओबीसींचं १४ टक्के आरक्षणावरून ११ टक्के आरक्षण केलं होतं. त्यानंतर त्यांनी १४ टक्क्यांवरून थेट ३० टक्के आरक्षण केलं होतं. घटनेची मर्यादा ही ५० टक्के होती. परंतु शरद पवारांनी ते ३० टक्क्यांवर नेलं आणि मराठ्यांच्या वाटेचं १६ टक्के आरक्षण शरद पवारांनी ओबीसींच्या घश्यामध्ये घातलं आहे. त्यामुळे २३ मार्च १९८३ च्या दिवशी इतिहासातील मराठ्यांच्या पाठित खंजीर खुपसण्याचं काम शरद पवारांनी केलंय. त्यामुळे मराठ्यांच्या प्रगतीला अडथळा आणण्याचा काम शरद पवारांनी केलंय. असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“गृहमंत्री पद झेपत नसेल तर राजीनामा देऊन प्रचारासाठी मोकळं व्हा”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
दरम्यान, शरद पवार हे महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. परंतु त्यांनी कधीही मराठ्यांचं भलं केलं नाही. कुठल्यालाही शिवजयंतीच्या जयंतीला ते नसायचे अन् कुठल्याही शिवचरित्राच्या कार्यक्रमाला कधीही मदत केली नाही. त्यांच्या जन्मदाखल्यावर हिंदू माळी, हिंदू तेली असं काही दिसत नाही. फक्त ओबीसी दिसत आहे. आणि या माणसाने ओबीसी प्रमाणपत्र वापरलं आहे. आणि मराठा म्हणून असल्याचं त्यांनी दाखवलं आहे. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी मान्य, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने सोपवला जीआर
हेही वाचा..“कुटुंब अजूनही सावरलं नाही, मुलगी दहशतीतच आहे,” बीडच्या हल्लाबाबत सोळंकेंनी दिली प्रतिक्रिया
हेही वाचा…ठरलं तर मग, “घड्याळ तेच, वेळ नवी”, अजित पवार गटाचा राज्यव्यापी दौरा
हेही वाचा…“दुष्काळ जाहीर करताना सरकारचे राजकारण, 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे”
हेही वाचा…“एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या घरी का आला ? ड्रग्स रॅकेटमध्ये हात आहे का ?” चौकशी करण्याची आव्हाडांची मागणी