मुंबई : मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देणार या शब्दावर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. यातच आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांना गॅलक्सी रूग्णालयात पोहचले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे राज्य सरकारचा जीआर त्यांच्या हाता दिला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी आता राज्य सरकारने पुर्ण केली आहे.
हेही वाचा..“आमच्यावरील हल्ला काही समाजकंटकांनी केला, लवकरच पुरावे देणार”, संदीप क्षीरसागर यांनी दिला इशारा
न्यायमूर्ती शिंदे समितीची कार्यकक्षा किंवा व्याप्ती वाढवावी, अशी पहिली मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. ती मागणी राज्य सरकारने शुक्रवारी रात्री पुर्ण केली आहे. त्याचा जीआर संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या हातात दिला आहे. मराठा समाजाला न्याय देण्यावर भर आहे, अर्धा -एक दिवस, पुढे-मागे होऊ शकतो. असं संदीपान भूमरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“गृहमंत्री पद झेपत नसेल तर राजीनामा देऊन प्रचारासाठी मोकळं व्हा”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
दरम्यान, उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटलांना संभाजीनगर येथील गॅलॅक्सी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळीच राज्य सरकारचं शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटलांना जीआर दिला आहे. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांची बैठक केली होती. त्यावर शिंदेंनी मराठा आरक्षणाबाबत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा..“कुटुंब अजूनही सावरलं नाही, मुलगी दहशतीतच आहे,” बीडच्या हल्लाबाबत सोळंकेंनी दिली प्रतिक्रिया
हेही वाचा…ठरलं तर मग, “घड्याळ तेच, वेळ नवी”, अजित पवार गटाचा राज्यव्यापी दौरा
हेही वाचा…“दुष्काळ जाहीर करताना सरकारचे राजकारण, 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे”
हेही वाचा…“एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या घरी का आला ? ड्रग्स रॅकेटमध्ये हात आहे का ?” चौकशी करण्याची आव्हाडांची मागणी
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश, कारवाई करण्यास वेग वाढला