मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आरक्षणासंदर्भातील शेवटच्या भाषणाचा सर्वांना विसर पडला आहे का ? प्रभु श्रीराम यांच्या विचारांचा रामराज्याचा विचार आपण मागे टाकत चाललो आहे का ? असा सवाल करीत मराठा आरक्षणाच्या विरोधात दाखल करणारे याचिका कर्ते वकिल गुणरत्ने सदावर्ते यांनी सरकारला सवाल केला आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण जरूर द्यावे परंतु ते आरक्षण विहित पद्धतीने देण्यात यावे असं सदावर्ते यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी मान्य, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने सोपवला जीआर
कारण इतर मागास वर्गीय संदर्भातील आरक्षणाची निती आहे. त्या नीतीमध्ये जी लोकं मागास नाही आहेत. ती मागास ठरवण्याच्या भानगडीत पडत आहोत. एखाद्या गावातला लोहार, सुतार, कुंभार तसे बारा बलुते दारांपैकी माणसं मुख्य प्रवाहात यावे, यासाठी आरक्षणाची निती ठरविली आहे. परंतु आता मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ग्रामपंचायत असो किंवा नगरपरिषद, नगरपंचायत अशा अनेक ठिकाणी मराठा भाऊ कुणबी मधून निवडणुकीला उभा राहणार आणि तोच निवडून येणार. अशी शक्यातीही सदावर्ते यांनी वर्तवली आहे.
हेही वाचा…“कुटुंब अजूनही सावरलं नाही, मुलगी दहशतीतच आहे,” बीडच्या हल्लाबाबत सोळंकेंनी दिली प्रतिक्रिया
पुढे बोलतांना ते म्हणाले की, याचं कारण म्हणजे आपल्या डोक्यातून १०० वर्ष तरी जात जाणार नाही. राजकारणातून तर कधीच जाणार नाही. असे अनेक उदाहरणे पाहिले आहेत की मुस्लिम समाज मुसलमांनाच मतदान करतंय. तसेच इतर समाजही त्याच पद्धीतीने मतदान करीत आहे. त्यामुळे लवकरच लोकशाहीला डेड एन्ड येईल. अन् त्यातून कधीच कुंभार नगराध्यक्ष होणार नाही. कधीच सुतार संरपंच म्हणून दिसणार नाही. कधीच लोहार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून दिसणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे सरकारने डेडएन्ड आणू नये.
हेही वाचा…ठरलं तर मग, “घड्याळ तेच, वेळ नवी”, अजित पवार गटाचा राज्यव्यापी दौरा
दरम्यान, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याअगोदर त्यांना मागास ठरवावं लागणार आहे. अगोदर आयोग स्थापन करावं लागणार. त्यामुळे राज्य सरकारने असं करू नये. मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. परंतु ते विहित पद्धतीत बसावं. आमची भूमिका आहे की ते सैंविधानिक दृष्ट्या देण्यात यावे, यातच मराठा आरक्षणासाठी जी समिती स्थापन केली आहे. त्यात फक्त एखाद्या विशिष्ट समाजाच्या लोकांना घेऊ नये. तसेच सरकारने इतर आरक्षणाच्या बाजूच्या लोकांचंही ऐकायला हवंय. असंही गुणरत्ने सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…काकाची पुतण्याच्या मतदारसंघात एंन्ट्री..! राज ठाकरे वरळी मतदारसंघात दाखल
हेही वाचा…एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये निवडणुक लढविणार, ‘या’ माजी मंत्र्याला विधानसभेचं दिलं तिकीट
हेही वाचा…“भाजपचे नेते मोहित कंबोजला कोर्टाचा मोठा दणका, सुषमा अंधारेंनी फडणवीसांचं नाव घेऊन डिवचलं”
हेही वाचा…“जनतेशी नाळ जोडलेला आमदार भाजपने गमावला, आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन”
हेही वाचा…“23 मार्च १९८३ रोजी शरद पवारांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला,” शरद पवार मराठा नाही तर ओबीसी, कुणी केले गंभीर आरोप?