नवी दिल्ली : काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना आज सक्तवसुली संचालनायानं समन्स बजावलं आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी त्यांना इडीकडून समन्स बाजवण्यात आले आहे. तसेच ८ जून रोजी त्यांना इडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. या प्रकरणाची फाईल्स इडीने २०१५ मध्ये बंद केली होती. मात्र आता ईडीने समन्स पाठवले आहे.
“बैल काही एकटा येत नाही, जोडीने येतो, ते पण नांगरसकट”; बैलगाडा शर्यतीत फडणवीसांचा हुंकार
सुब्रमण्याम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी, तसेच दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते. यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ते चुकीच्या पद्धतीने विकत घेतले गेले. आणि काॅंग्रेस नेत्यांनी २,००० कोटी रूपयांपर्यतची मालमत्ता जप्त केली असा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता.
राज्यसभा उमेवारीवरून कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य..कॉंग्रेस सरचिटणीसांनीच दिला राजीनामा
या प्रकरणाचा तपास इडीने २०१४ मध्ये सुरू केला होता. यंग इंडिया लिमिटेडचा उद्देश नफा कमावणे हा नसुन ती चॅरीटीसाठी स्थापन करण्यात आली आहे, असं प्रकरणावर काॅंग्रसेचं म्हणणं आहे. तसेच काॅंग्रेसने नॅशनल हेराल्डला ९० कोटींचे कर्ज दिले होते. द असोसिएटेड जर्नल ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता.
Read also:
- “गांधींच्या भारताला विकृत अवस्थेतून बाहेर काढावा लागेल”; काॅंग्रेसच नेत्याचं वक्तव्य
- लोकसभेच्या मैदानात नवनीत राणांविरोधात प्रणिती शिंदे उतरणार?
- “जीएसटीचे पैसे पेट्रोल, डिझेल कर कपातीसाठी आले नाहीत”; अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांना सुनावलं
- “यांचा तो बाळ्या, लोकांचे ते कार्टे, ही भूमिका नाही चालणार”; रूपाली पाटील भाजपवर संतापल्या
- “बैलगाडा शर्यती अखंडित सुरू राहण्यासाठी जीवाची बाजी लावू,पण शर्यत कदापि बंद होवू देणार नाही”