यवतमाळ : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गवळींवर १०० कोटींच्या घोटाळयाचा आरोप केल्यांनतर, शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार असलेल्या भावना गवळी अडचणीत सापडल्या असून, त्यांच्या ५ संस्थांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले होते. या पथकांपैकी काहीजण देगाव येथील बालाजी पार्टिकलला, काही अधिकारी रिसोड शहरातील दि रिसोड अर्बन कॉ. ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड इथे तर काहींनी शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली होती आणि झडती घेतली होती.
भाजप आमदारांचा ५०० कोटींचा घोटाळा, भावना गवळींकडून ईडी चौकशीची मागणी
दरम्यान, या सगळ्या घटना क्रमानंतर ईडीने गवळी यांच्या दोन निकटवर्तीय सहकाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार या दोन्ही सहकाऱ्यांनी ईडीसमोर अजूनही हजेरी लावलेली नसून, त्यांनी खासगी कारण देत १५ दिवसांची मुदतीची मागणी ईडीकडे केली आहे. ईडीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानशीसंबंधित दोन व्यक्तींना आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी समन्स पाठवले होते.
Two persons associated with Shiv Sena leader Bhavana Gawali's 'Mahila Utkarsh Trust' were summoned by ED, in connection with a money laundering case. Both the persons who were summoned by the agency did not appear before it citing personal reasons and asked for 15 days time.
— ANI (@ANI) September 7, 2021
वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी खासदारकीच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. आपल्याकडे सबळ पुरावे असून ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग यांसह अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्याची माहिती २० ऑगस्ट रोजी वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेते किरीट सोमय्या यांनी दिली होती.
शिवसेना खासदार भावना गवळींना मोठा धक्का; ५ संस्थांवर ED ची छापेमारी
तसेच, वाशीम जिल्हय़ातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसैनिक अडथळे आणलात असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर सोमय्या यांनी, गवळींनी ५५ कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना २५ लाख रुपयात घेतला असल्याची तक्रार केली होती. त्यांनंतर ईडीच्या पथकाने रिसोड अर्बन सहकारी पतसंस्था, आयुर्वेद महाविद्यालय, भावना पब्लिक स्कूल, डी.फॉर्म महाविद्यालय, पुंडलिकराव गवळी महाविद्यालय, शिरपूर जैन या संस्थांमध्ये धाडी टाकल्या होत्या.
Read Also :
- परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या, भ्रष्टाचारप्रकरणी जामीनपात्र वॉरंट जारी
- राज्यात कॉलेजेस कधी सुरू होणार? अखेर मुहूर्त ठरला! उदय सामंत यांची मोठी घोषणा
- “OBC आरक्षणाशिवाय निवडणूका होय नयेत! पण…”, शरद पवारांनी केलं मोठं विधान
- मोहन भागवतांच्या ‘सर्व धर्म एकचं आहेत’ विधानावर शरद पवारांनी लगावला टोला
- “भानगडी करणारेच सत्तेत होते, मग ईडी का कारवाई करेल?” भाजपाचं पवारांना प्रत्युत्तर