मुंबई : महामारीमुळे दूर दृश्य प्रणालीद्वारे सुरु असणारी राज्यातील महाविद्यालये, आता महामारीचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत असल्यामुळे, लवकरच सुरु होणार आहेत. काही महिन्यांपासून हळूहळू अनलॉकचा निर्णयही घेण्यात आल्यांनतर, आता उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी येतं शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा विचार असल्याची मोठी घोषणा केली आहे. महामारीचे सर्व नियम पाळूनच राज्यात महाविद्यालये सुरु केली जातील, असेही त्यांनी सांगितले.
‘या’ ५ जिल्ह्यांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका, आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा
“राज्यातील सगळ्या जिल्ह्यांतील महाविद्यालये एकाच वेळी सुरु होतील असं होणार नाही. आम्ही त्या-त्या भागातील महामारीची स्थिती लक्षात घेऊ त्याबद्दलचा निर्णय घेणार आहोत आणि नवीन शैक्षणिक वर्ष कसं असावं त्यासंबंधीची माहिती देणार आहोत,” असं त्यांनी सांगितलं. तसेच त्यांनी सीईटी परीक्षेच्या तारखाही यावेळी जाहीर केल्या. यावर्षी सीईटीला एकूण ८ लाख ५५ हजार ८६९ विद्यार्थी बसणार असून, २२६ केंद्रांवर १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरमध्ये, ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे.
“OBC आरक्षणाशिवाय निवडणूका होय नयेत! पण…”, शरद पवारांनी केलं मोठं विधान
दुसरीकडे, काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, “डॉ. प्रभू यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्स नेमला असून, त्यांनी एसओपी दिलेली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं १००% लसीकरण अत्यावश्यक आहे. तसेच, शाळा व शाळेच्या आसपासचा भाग स्वच्छ आणि सॅनिटाईज करून घ्यावा, विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी असावी, यासंदर्भातील सूचना शालेय शिक्षण विभागाला दिल्या गेल्या आहेत. त्यांनी यासंदर्भातला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असून, आता ते पुढचा निर्णय घेतील,” असं सांगितलं होत.
मोहन भागवतांच्या ‘सर्व धर्म एकचं आहेत’ विधानावर शरद पवारांनी लगावला टोला
दरम्यान, गेल्या जवळपास दोन वर्षांपासून महाविद्यालयात जाण्याची वाट पाहत बसलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळणार असून, अडीसारखे शिक्षण मिळणार असल्याचे समाधान नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळेल. तसेच, यामुळे आता ऑनलाईन शिकताना ज्या काही अडचणी निर्माण होत होत्या, त्या दूर होणार असल्याने यामुळे नक्कीच गावाकडील विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे.
Read Also :
- “भानगडी करणारेच सत्तेत होते, मग ईडी का कारवाई करेल?” भाजपाचं पवारांना प्रत्युत्तर
- “संघर्षाचं कौतुक करायला हवं, पेढे काय वाटताय? हा आनंद तर…” राऊतांची खोचक टीका
- “मेहबूब शेखसारखे बलात्कारी मोकाट, त्यामुळे विकृतांना बळ”- चित्रा वाघ
- “सगळ्या दुरुस्त्या केल्या जातील”, ईडीच्या कारवाईवरून पवारांचा सूचक इशारा
- “ते कुठले डॉक्टर तपासावं लागेल,” मोहन भागवतांच्या विधानावर पटोलेंची टीका