नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी, “हिंदू असो की मुस्लिम सर्वांचा डीएनए एकच आहे. प्रत्येक भारतीय हा हिंदूच आहे. त्यामुळे, मुस्लिम समाजामधील विद्वानांनी कट्टरपंथीयाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे,” असं वक्तव्य केलं. दरम्यान, त्यांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, “भागवत सर्व धर्मांना एक समजतात, माझ्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. हेच आमच्यासाठी खूप आहे.” असा टोला लागावला आहे.
“भानगडी करणारेच सत्तेत होते, मग ईडी का कारवाई करेल?” भाजपाचं पवारांना प्रत्युत्तर
ते पुण्यात साधना सहकारी बँक लि. पुणे मुख्य कार्यालय प्रशासकीय नूतन वास्तू उदघाटन समारंभ आणि माजी खासदार विठ्ठलराव तुपे पाटील पुर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. “भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिम यांचे पूर्वज एकच आहेत. हिंदू धर्माची ही व्याख्या जे मानतात, त्या सगळ्यांना आम्ही हिंदू मानतो,” असे भागवत म्हटले होते. त्यावर, “त्यांना हिंदू – मुस्लिम एक वाटतात हे ऐकून चांगलं वाटलं. त्यामुळे माझ्या ज्ञानातही भर पडली,” अशीही तिरकस प्रतिक्रिया त्यांनी दिली.
“संघर्षाचं कौतुक करायला हवं, पेढे काय वाटताय? हा आनंद तर…” राऊतांची खोचक टीका
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी देखील जोरदार टीका केली असून, “आमची डीएनए टेस्ट करा. त्याला आम्ही तयार आहोत. पण, एकीकडे आमचा डीएनए तपासत असताना तुम्हाला तुमचाही डीएनए तपासावा लागेल. आता ती वेळ आली आहे,” असं म्हणत, “हे लोक भारताचं संविधान मान्य करणार नाहीत. पण डीएनए टेस्ट करायला तयार होतील. संघवाल्यांना इतिहासाचं अपूरं ज्ञान आहे,” असा हल्लाबोल केला आहे.
“मेहबूब शेखसारखे बलात्कारी मोकाट, त्यामुळे विकृतांना बळ”- चित्रा वाघ
दुसरीकडे, पटोले यांनी देखील आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भागवतांवर निशाणा साधत, “ते कुठले डॅाक्टर आहेत, हे एकदा तपासून घ्यावं लागेल. देशाच्या संविधानात समभावाची भावना लिहिण्यात-सांगण्यात आली आहे. ही सर्वधर्म समभावाची भावाना काँग्रेसने देशभरात मांडली. आपलं रक्त एक आहे असं म्हणण्यापेक्षा, सर्वधर्म समभाव आहे, असं ते बोलले असते, तर त्याचं स्वागत केलं असतं,” अशी टीका त्यांनी केली आहे.
Read Also :
- “सगळ्या दुरुस्त्या केल्या जातील”, ईडीच्या कारवाईवरून पवारांचा सूचक इशारा
- मराठवाड्यात पावसाचे थैमान : परभणीत पुराच्या पाण्यात बैलजोडी गेली वाहून
- “ते कुठले डॉक्टर तपासावं लागेल,” मोहन भागवतांच्या विधानावर पटोलेंची टीका
- बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? भारती पवार
- ‘या’ ५ जिल्ह्यांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका, आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा