मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तिसऱ्या जागतिक भारतीय समुद्री परिषदेला सुरूवात झाली आहे. या परिषदेसाठी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय बंदरे व जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोरवाल, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक व शंतून ठाकूर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय सचिव टी. के. रामचंद्रां, फिक्कीचे अध्यक्ष सुभ्रकांत पांडा यांची उपस्थिती होती. यावेळी विविध देशातील मंत्री देखील व्यासपीठावर उपस्थितीत होते. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार आहेत.
हेही वाचा…“मीरा बोरवणकर यांचा बोलवता धनी कोण? याचीही चौकशी व्हावी,” अजित पवारांसाठी नेते सरसावले
राज्याला लाभलेला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा, २ प्रमुख बंदरे, १४ पेक्षा जास्त मोठी आणि मध्यवर्ती बंदरे आणि असंख्य खाड्या या सर्वांचे भारताच्या सागरी व्यापार वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात मालवाहतुकीच्या प्रमाणात उल्लेखनीय वाढ झाली असून प्रवासी वाहतूक सेवेसाठी नवीन मार्ग सुरू केले आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी भारतातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बंदरांपैकी आणि टॉप ३० जागतिक बंदरांपैकी एक असून मुंबई पोर्ट एथॉरिटी जगभरातील सर्वोत्तम परंतु सर्वात कमी क्रूझ टॅरिफ देते. असं जागतिक भारतीय समुद्री परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा…“आघाडी धर्म पाळण्यासाठी त्यांचं ऐकावं लागेल असं सांगण्यात आलं,” मीरा बोरवणकरांचा आणखी एक गौफ्यस्फोट
आगामी काळात राज्यातील बंदरांवर हायड्रोजन हबची स्थापना, एलएनजी बंकरिंग यासारख्या सुविधा निर्माण करणार आहोत, त्यामुळे राज्यातील बंदरे विकास एका उंचीवर जाईल. रेल्वे, समुद्र आणि जलमार्ग यांना एकत्रित करणारी मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी विकसित करण्यावर आमचे लक्ष आहे. पीएम गति शक्ती योजनेत लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
हेही वाचा…“भिडे वाड्याचे लवकरच राष्ट्रीय स्मारकात रूपांतर,” उच्च न्यायालयातील खटला महापालिकेने जिंकला
पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र विकासात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. खासगी बंदरांसाठी रस्ते आणि रेल्वे पायाभूत सुविधा विकसित करण्याव्यतिरिक्त आमचे सागरी धोरण सागरी पर्यटन, जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर उद्योगांना महत्त्वपूर्ण चालना देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जागतिक सागरी क्षेत्रात भारताचे स्थान उंचावले आहे. राज्याचे नवे बंदरे धोरण अतिशय लवचिक आणि विकासाला मोठी संधी देणारे आहे. सागरी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रासोबत भागीदारी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणासंदर्भातील सुनावणी पुन्हा लांबणीवर, दिवाळीनंतर निकाल लागणार ?
हेही वाचा…“नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी मराठा आरक्षणात लक्ष घालावे,” मनोज जरांगे पाटलांची मागणी
हेही वाचा…“राहुल नार्वेकर चोरांना सरंक्षण देताहेत, त्यांचं नाव काळ्या कुट्ट इतिहासात..,” राऊतांचा जोरदार घणाघात
हेही वाचा…“भिडे वाड्याचे लवकरच राष्ट्रीय स्मारकात रूपांतर, चंद्रकांत पाटील आणि महायुती सरकारने केलेल्या पाठपुराव्याला यश”, हेमंत रासने
हेही वाचा…सर्वोच्च न्यायालय आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार