नागपूर : महाराष्ट्रातल्या १५०० ठिकाणी ओबीसी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. ओबीसीआरक्षणाचे खरे मारेकरी कोण?, ओबीसी खातं आम्ही तयार केलं, वडेट्टीवार त्या खात्याचे मंत्री म्हणून मिरवतात. या सरकार मधील मंत्री एक मेकांच कपडे फाडायला तयार आहे. या संदर्भातील याचिकाकर्ते सुद्धा काँग्रेसशी संबंधित आहेत. या सरकारला आता ओबीसी आरक्षण द्यावं लागेल नाही तर खुर्ची खाली करावी लागेल. हे सरकार मोदीकडे बोट दाखवत त्यांनी डेटा दिला नाही असं सांगतात. हे सरकार प्रत्येक गोष्टीत मोदीकडे बोट दाखवत यांच्या बायकांनी याना मारलं तरी ते मोदी जी नी केलं अस म्हणतील, अशी खोचक टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते नागपूरात ओबीसी आरक्षणाच्या चक्काजाम आंदोलनात बोलत होते.
अवघ्या काही मिनिटातच विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आशिष शेलारांना अटक
फडणवीस म्हणाले, ५० टक्क्यांच्या वरचं आरक्षण भाजप सरकारने वाचवलं, एक दिवसात ऑर्डिनन्स पारित केला. पण, सरकार गेली आणि या सरकारने आमचा ऑर्डिनन्स लॅप्स केला. १३ डिसेंबर २०१९ ला सर्वोच्च न्यायालयाने आदेशात सांगितलं की के कृष्णमूर्ती यांच्या जजमेंटमध्ये सांगितलं. प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे ओबीसी आरक्षण आहे, त्या ठिकाणी राज्य मागास वर्ग आयोग तयार करुन दर दहा वर्षांनी इम्पेरिकल डाटा तयार करा आणि त्यावरुन राज्यसरकारला सांगितले की याचा कम्लॅअन्स करा पुढच्या तारखेला आम्हाला सांगा. हे ५० टक्क्याच्या आतल्या आरक्षणाबाबत होतं. यामध्ये राज्य सरकारला इतकंच करायचं होतं की राज्य मागास वर्ग आयोग तयार करुन त्यांना इम्पेरिकल डाटा तयार करण्यासाठी एजन्सी नेमायची होती, तसं अॅफीडेवि़ट लिहून सादर करायचं होतं, त्यामुळे सर्व हे ५० टक्क्याच्या आतलं आरक्षण वाचलं असतं, मात्र या सरकारने १५ महिने अॅफीडेवि़टच केलं नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
समाजावर अन्याय करताना ठाकरे सरकारला लाज वाटायलां पाहिजे – पंकजा मुंडे
पुढे बोलताना ते म्हणाले, सातवेळी तारखा घेतल्या, शेवटच्या तारखेला त्या आदेशात लिहिलंय की राज्य सरकारला वेळकाढू धोरण करायचं आहे, हे गंभीर नाहीयेत, हे लोक जाणीवपूर्वक सांगितललेली कारवाई करत नाहीत, म्हणून आम्ही ५० टक्क्याच्या आतलंही आरक्षण रद्द करतो. देशाच्या प्रत्यंक राज्यात ओबीसी आरक्षण आहे आमि तुमचे १५ महिने पूर्ण होता होता केवळ महाराष्ट्रातलं आरक्षण गेलं आहे.
सरकारचे डोळे उघडले नाही तर वारंवार आंदोलन करावं लागेल!
या सरकारमध्ये ओबीसी नेत्यांचं महत्त्व हे एखाद्या ताटात चटणी, कोशींबीर, लोणचे असते, तितकंच आहे. ते खाजगीत काय बोलतात हे तुम्हाला सांगू शकत नाही. त्यांना राजकीय भविष्य आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या राजकीय मालकांनी ने सांगितलं ते तितकंच करतात. हे षड्यंत्र आहे, फेब्रुवारीत निवडणुका होणार आहेत, ८५ टक्के महाराष्ट्र निवडणुकीला जातं, तोपर्यंत हे आरक्षण होऊ द्यायचं नाही, ओबीसींना वंचित ठेवायचं म्हणून आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल, आपला दबाव आणावाच लागेल, सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडावंच लागेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
Read Also :
- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला सुरूवात
- समाजावर अन्याय करताना ठाकरे सरकारला लाज वाटायलां पाहिजे – पंकजा मुंडे
- अवघ्या काही मिनिटातच विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आशिष शेलारांना अटक
- ठाकरे सरकरने राज्यात लागू केले पुन्हा निर्बंध; राज्याच्या अनलॉक नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल
- राज्यातील शाळा-कॉलेज कधी उघडणार? गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय!