मुंबई : प्रभू श्रीराम शाकाहारी नाही तर मासांहारी होता, असं विधान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर राज्यात एव्हाना देशात मोठा वाद निर्माण झाला. भाजपच्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर या विधानावरून जोरदार टिका केली. तर संपुर्ण राज्यात आंदोलने काढण्यात आलीत. यातच आता डॉ. बाबासाहेब आबंडेकर यांनी न्यायव्यवस्थेतही आरक्षण ठेवायला पाहिजे होते. न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या ८० टक्के समाजावर अन्याय केलाय. असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावर आता पुन्हा आव्हाडांनी स्पष्टीकरण दिले आहे.
हेही वाचा…गडचिरोलीत 10,000 कोटींचा ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट, देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांना यश
जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्वविटरवर एक पोस्ट टाकली आहे. त्यात असं म्हटलंय की, काल नागपूरमध्ये एका सामाजिक विचारमंचावर ‘आजच्या परिस्थितीत आरक्षणाचे महत्व’ या विषयावर माझे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . या व्याख्यानादरम्यान मी जवळपास एक तास भाषण करून विविध मुद्यांना स्पर्श केला; जसे की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील कामगारांना न्याय दिला. बोनस, आठ तास काम, साप्ताहिक सुट्टी हे सर्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची देण आहे. येथील रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, येथील एरिगेशन आणि पाणी वितरण हेदेखील बाबासाहेब आंबेडकर यांचेच देणं आहे. देशातील महिलांना मिळणारे अधिकारही डाॅ. आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलमध्ये आणले होते. पण , दुर्देवाने ते स्वीकारले गेले नाही. ३४० व्या कलमामध्ये अतिपीडित, शूद्र म्हणजेच इतर मागासवर्गीय (obc) यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद करून ठेवली होती. म्हणूनच उशिरा का होईना पण इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळाले.
हेही वाचा…“व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा,” शिंदे गटाची उच्च न्यायालयात धाव
मात्र, माझे भाषण मोडून – तोडून ज्यामध्ये मी असे म्हटले होते की, “बाबासाहेब आंबेडकर यांनी 80 % बहुजन समाजाला न्यायव्यवस्थेतही आरक्षण द्यायला हवे होते.” एखादा विचार व्यक्त करताना तो माझा वैयक्तिक विचार आहे. मी माझ्या संपूर्ण भाषणात महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल उहापोह केला. ते पत्रकारांना दिसले नाही; ते त्यांनी दाखवलं नाही. पण, बरोबर एखादा मुद्दा पकडून एखाद्याला मारायचेच, याच व्यवस्थेच्याच विरोधात आम्ही आहोत ना! एखाद्याची प्रतिमा उचलून मलिन करायची असेल तर कुणाबद्दलच बोलायचे नाही आणि शांतपणे इतरांप्रमाणेच मौनव्रत धारण करायचे का? हिमंत असेल तर पूर्ण भाषण दाखवा. माझे आव्हान आहे की, त्यातील माझी एक चूक काढून दाखवा. मोडून – तोडून भाषण दाखवण्याची सवय सोडून द्या आणि उगाच कारण नसताना टीआरपी वाढवण्यासाठी एखाद्याला कामधंद्याला लावू नका. केंद्र किंवा राज्यात वरीष्ठ अधिकाऱ्यांन मध्ये किती टक्के बहुजन आहेत ह्याची माहिती घ्या सत्य लगेच सामोरे येईल. असंही आव्हाडांनी सांगितलेय.
काल नागपूरमध्ये एका सामाजिक विचारमंचावर ‘आजच्या परिस्थितीत आरक्षणाचे महत्व’ या विषयावर माझे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . या व्याख्यानादरम्यान मी जवळपास एक तास भाषण करून विविध मुद्यांना स्पर्श केला; जसे की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथील कामगारांना न्याय दिला. बोनस, आठ…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 17, 2024
READ ALSO :
हेही वाचानरेंद्र मोदींच्या आव्हानानंतर भाजपची मंदिर स्वच्छता मोहिम, लहू बालवडकरांनी केली बालेवाडीतील मंदिरांची स्वच्छता
हेही वाचा…“सुशील कुमार शिंदेंना भाजपची ऑफर, आज चंद्रकांत पाटील सुशील कुमारांच्या घरी, चर्चांना उधाण”
हेही वाचा…“तर त्यातून लगेचच जातीचा वास येतो”, आव्हाडांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, वातावरण तापणार
हेही वाचा…“जयंत पाटलांची उंची मोठी, त्यांना साथ द्या,” शरद पवारांचं सांगलीकरांना साकडं
हेही वाचा…“ठाकरे गटाचे महानाटकही फसले अन् राऊतांनी पु्न्हा एका उद्धव ठाकरेंना फसवले”