मुंबई : प्रभू श्रीराम शाकाहारी नाही तर मासांहारी होता, असं विधान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर राज्यात एव्हाना देशात मोठा वाद निर्माण झाला. भाजपच्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर या विधानावरून जोरदार टिका केली. तर संपुर्ण राज्यात आंदोलने काढण्यात आलीत. यातच आता जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण होऊ शकतो.
हेही वाचा…“आता जनतेनं ठरवावं की कुणाला गाडावं अन् कुणाला पुरावं”, ठाकरेंची महापत्रकार परिषद, विरोधकांना भरली धडकी
जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबाबत एक विधान केलं आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, आजही वाईट वाटतं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायव्यवस्थेतही आरक्षण ठेवायला पाहिजे होते. न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या ८० टक्के समाजावर अन्याय केला आहे. न्यायपालिकेतील निर्णय असे येतात की लगेच त्यातून जातीचा वास येतो. न्यायव्यवस्थेकडून हे अपेक्षित नाही. न्यायव्यवस्था निष्पक्ष असली पाहिजे, अशी संविधानाची अपेक्षा आहे. पण खरचं असं होतं का ? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
हेही वाचा…जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली, त्याच ठरावाला नार्वेकरांची शिवसैनिक म्हणून हजेरी, ठाकरे गटाकडून चिरफाड!
दरम्यान, पुढे बोलतांना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आता कुठे तरी बार कॉन्सिलमध्ये बहुजन लोक दिसायला लागलेच. त्यांच्या पिढ्याच शिकल्या नाहीत, मग बारमध्ये कसे जातील? ते बारमध्ये जायचे, त्या बारमधून निघून या बारमध्ये यायला गेली ना ७० वर्षे निघून, असंही आव्हाड म्हणाले. जितेंद्र आव्हाडांच्या विधानाचं पडसाद राजकीय वर्तुळात पडले असून याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जयंत पाटलांची उंची मोठी, त्यांना साथ द्या,” शरद पवारांचं सांगलीकरांना साकडं
हेही वाचा…“ठाकरे गटाचे महानाटकही फसले अन् राऊतांनी पु्न्हा एका उद्धव ठाकरेंना फसवले”
हेही वाचा…गडचिरोलीत 10,000 कोटींचा ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट, देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांना यश
हेही वाचा…“व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा,” शिंदे गटाची उच्च न्यायालयात धाव
हेही वाचा…अध्यक्षांच्या निर्णयाची ठाकरे गटाकडून चिरफाड, आता नार्वेकरांची पत्रकार परिषद म्हणाले…