मुंबई : राज्यात आणि केंद्रात एकाच विचारधारेचे सरकार असल्याने या सर्व पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची राज्यकर्त्यांकडून मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबद्दल एक विश्वास देण्याकरीता स्थगन प्रस्तावावरमार्फत सर्व कामकाज बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करण्याची आग्रही मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. राज्यातील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, कापूस, हरभरा या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अत्यंत अडचणीत आले आहेत. विधानसभा विरोधी पक्षेनेते अजित पवार यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
हेही वाचा..कांद्यासह कापसाच्या माळा घालून विरोधक आक्रमक, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील लासलगाव हे कांद्याचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच मांडण्यात आलेल्या स्थगन प्रस्तावात सहभाग घेऊन छगन भुजबळ यांनी त्यांच्या मतदारसंघाची स्थिती मांडत त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली. कांद्याला मिळणारी तुटपुंजी रक्कम पाहून शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकत कांद्याचे मार्केटही बंद केले आहे. तुर्की, पाकिस्तान, कजाकिस्तान, युक्रेन अशा देशात कांद्याचा प्रचंड तुटवडा आहे. कांदा उत्पादक शेतकरी अतिशय गरीब वर्गातून येतो.
हेही वाचा..” राज्यात मोगॅम्बोच्या पिढ्या उतरल्या तरी भिनलेली शिवसेना काढू शकणार नाही”, उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल
त्यामुळे आपल्या देशातील कांदा या देशात निर्यात केला पाहिजे तसेच नाफेडनेदेखील कांदा निर्यात केला पाहिजे यातून कांद्याचे भाव वर येण्याची शक्यता आहे. बांग्लादेशमध्ये द्राक्षावर ड्युटी वाढवण्यात आल्याने तिकडे द्राक्ष जात नाहीत. यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी आणि पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली तर हे पीक निर्यात होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.
Read also
- हेही वाचा.सत्तासंघर्षाचा निकालाची तारीख ठरली, सर्वोच्च न्यायालयाकडून निकालाची पृष्ठी
- हेही वाचा..”“सत्यजीत तांबे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला,” भेटीचं ‘कारण’ही सांगितलं
- हेही वाचा..“ईडी-सीबीआय भाजपच्या दावणीला बांधलेली पाळीव कुत्रे,” मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या विरोधात आपचं जोरदार आंदोलन
- हेही वाचा..निकालाआधी पुण्यात लागले बॅनर, निवडणुक आयोगाने कानात येऊन सांगितलं काय? सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल
- हेही वाचा..शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा अडचणीत टाकलं, विधान परिषदेच्या प्रतोदपदी ‘या’ नेत्यांची केली निवड