मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचीसुनावणी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली आहे. आता ही सुनावणी पुढील तीन दिवस सलग चालणार आहे. मागील सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता. आज कोर्टात शिंदे गटाचे वकिल युक्तिवाद करणार आहेत. त्याआधी हे प्रकरण याच आठवड्यात संपवा, असे सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी वकिलांना सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा..” राज्यात मोगॅम्बोच्या पिढ्या उतरल्या तरी भिनलेली शिवसेना काढू शकणार नाही”, उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल
सकाळी ठाकरे गटाकडून कोर्टात अभिषेख मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी यावेळी किहोटो केसच्या दाखल्याचं वाचन करून दाखवत २७ जुनची परिस्थिती जैसे थे हवी, आणि प्रकरण अध्यक्षांकडे सोपवायचं असेल तर जुन्या अध्यक्षांना परत आणा, असा युक्तिवाद कोर्टात केला. त्याचबरोबर त्यांनी सुरूवातीपासूनच दहाव्या सुचीच्या अधिकाऱ्यांचा गैरवापर झाल्याचं म्हणत पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदीचं त्यांच्याकडून वाचन करण्यात आलं. त्याचबरोबर त्यांनी यासंदर्भात श्रीमंत पाटील केसही दाखला देत आमदार अपात्र झाल्यास मंत्रीपदाची शपथ घेता येत नसल्याचाही युक्तिवाद त्यांनी केला.
हेही वाचा..“..यात राज्यपालांचीही चुक नाही, पण…;” राज्यपालांच्या अभिभाषणावर राष्ट्रवादीची जोरदार टिका
शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला. ठाकरेंच्या आमदारांना अपात्र केलं जाऊ शकतं. अशी शक्यताही सिंघवीकडून व्यक्त करण्यात आली. राज्यापालांना माहीत होते की, ही फुट नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं तर वकील देवदत्त कामत यांनी शिंदेंच्या प्रतोद नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला. प्रतोद पदाची निवड बेकायदेशीर असल्याचं त्यांनी सांगितलं. याच आठवड्यात प्रकरण संपवायचं असल्याचं म्हणत सरन्यायाधीशांनी शिवसेनेच्या वकिलांना परवापर्यंत युक्तिवाद करण्याचं सांगितलं. तसेच शिंदे गटाकडून उद्या किंवा आज नीरज कौल युक्तिवाद करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात काय निकाल लागणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Read also
- हेही वाचा..”“सत्यजीत तांबे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला,” भेटीचं ‘कारण’ही सांगितलं
- हेही वाचा..“ईडी-सीबीआय भाजपच्या दावणीला बांधलेली पाळीव कुत्रे,” मनीष सिसोदिया यांच्या अटकेच्या विरोधात आपचं जोरदार आंदोलन
- हेही वाचा..निकालाआधी पुण्यात लागले बॅनर, निवडणुक आयोगाने कानात येऊन सांगितलं काय? सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल
- हेही वाचा..शिंदेंनी ठाकरेंना पुन्हा अडचणीत टाकलं, विधान परिषदेच्या प्रतोदपदी ‘या’ नेत्यांची केली निवड
- हेही वाचा..कांद्यासह कापसाच्या माळा घालून विरोधक आक्रमक, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार