मुंबई : निवडणुक चिन्ह आणि नाव गेल्यानंतर अनेक जण मला येऊन भेटले. साहेब निवडणुका येऊ द्या, ही आपल्याला एक मोठी संधी आहे. हे आपल्या राजकीय आयुष्यातील शेवटचे आव्हान असून ते आपल्यालाल जिंकायचेच आहे. शिवसेना म्हणजे केवळ नाव आणि चिन्ह नाही, ती हजारोंच्या मनात भिनलेली आहे. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. तसेच मोगॅम्बोच्या पिढ्या उतरल्या तरी भिनलेली शिवसेना काढू शकणार नाही. असा इशाराही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिला.
हेही वाचा..“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोटनिवडणुकीत माझ्याच घरात पैसे वाटले,” रवींद्र धंगेकरांचा मोठा आरोप
मराठी भाषा गौरव दिनी बिर्ला मातोश्री सभागृह येथे स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजप, शिंदे गट आणि निवडणुक आयोगावर प्रखरशब्दात टिका केली. निवडणुक आयोग बोगस आहे. त्याला चुना आयोग म्हणायला हवे. सगळं भाजपच्या सोयीने सुरू आहे. आता सगळ्यांना पटायला लागलंय की, २०२४ ची निवडणुक कदाचित शेवटची निवडणुक असेल. कपिल सिब्बल जे म्हणाले ते योग्य आहे. घटना स्पष्ट आणि स्वच्छ आहे. मध्येच निवडणुक आयोगाने चोमडेपणा करण्याची गरज नव्हती. अशी नाराजी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा..राजकारण तापलं…! भाजप हाय हाय, सिसोदिया जिंदाबाद, घोषणा देत आपचं संपुर्ण देशभरात भाजपच्या विरोधात आंदोलन
पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आणीबाणीचा काळही पाहिला आहे. त्यावेळी देशात बेधुंदी माजेल की काय अशी परिस्थिती होती. म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. मात्र, याचा अर्थ नंतर आणीबाणीत जे झालं त्याला शिवसेनाप्रमुखांचा पाठिंबा होता असं नाही. आणीबाणीत मार्मिकवरही बंधनं होती. मार्मिक छापण्यासाठी बंदी नाही, मात्र मार्मिकच्या छापखान्यावर बंदी अशी विचित्र बंदी असायची, इतर कोणी छापून द्यायला तयार व्हायचे नाही. असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा..“महाराष्ट्रातील तरूणांचा आवाज बनून विधानभवनात बाजू मांडणार” सत्यजीत तांबेंचं विधान
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही कडाडून टिका केली. चोरीला मामला, जोरजोरात बोंबली, अशी शिंदे गटाची अवस्था; सर्वकाही चोराल, पण ठाकरे कसे चोराल, ठाकरे मी एकटा नाही, माझ्यासमोर असलेली जनता म्हणजे ठाकरे, काहीही चोरता येतं, पण संस्कार चोरता येत नाहीत. आई वडिल जे संस्कार देतात ते झाले नाहीत. की मग दुसऱ्यांची गोष्ट चोरण्याची वेळ येते. त्यामुळे मी चोरांवर जास्त बोलणार नाही. त्यांना लाज लज्जा नसेल. पण दिवारमध्ये जसा हातावर शिक्का होता, तसाच जे जेव्हा छातीवर धनुष्यबाण लावतील तेव्हा त्यांच्या कपाळावर शिक्का असेल की, स्वत: चोर आहेस. हे चोरलेलं धनुष्यबाण आहे. असा टोलाही त्यांनी हाणला.
Read also
- हेही वाचा..“..यात राज्यपालांचीही चुक नाही, पण…;” राज्यपालांच्या अभिभाषणावर राष्ट्रवादीची जोरदार टिका
- हेही वाचा..“अमित शहा ईव्हीएम मशीन सॅटेलाईटद्वारे नियंत्रित करतात”, चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा
- हेही वाचा..““मला फसवण्यासाठी माझ्या गाडीत गांजा, चरस अफू..” गिरीश महाजनांचा मोठा दावा
- हेही वाचा..“महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या चिखल झालाय,” राज ठाकरेंचं राजकारणावर प्रखरड भाष्य
- हेही वाचा..अधिवेशनाच्या पुर्वसंध्याला अजित पवारांकडून आमदारांना धडे, सभागृहाच्या नियमाचा वाचून दाखवला पाडा