मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरूवात झाली आहे. विधीमंडळाच्या सभागृहात आज राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांंच अभिभाषण झालं. त्यानंतर सभागृहाच काम सुरू झालं. सुरूवातीला मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली. त्यानंतर दोन्ही सभागृहात वेगवेगळ्या मुद्यांवरून गदारोळ सुरू झाल्याने विधानसभा अध्यक्षांनी सभागृह दिवसभरासाठी तहकुब करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा..मतमोजणीपुर्वीच धंगेकर अन् रासनेंच्या अडचणी वाढल्या, दोन्ही उमेदवारांच्याविरोधात गुन्हा दाखल
यातच विधिमंडळ सभागृहांचं कामकाज भारतीय संविधान, नियम, प्रथा पंरपरेनुसार चालतं. अलीकडच्या काळात बऱ्याच प्रथा, पंरपरा आणि नियमांना बगल दिली जात असल्याची गंभीर बाब सभागृहाच्या निदर्शनास अजित पवार यांनी आणून दिली. विविध आयुधांचा वापर करून सदस्यांनी सादर केलेल्या सुचना मान्य किंवा अमान्य याची माहिती सदस्यांना मिळत नाही, कपात सुचनांची यादी सदस्यांना दिली जात नसल्याचंही अजित पवारांनी सांगितले. तसेच ही यादी कार्यवाहीसाठी मंत्रालयीन विभागांना पाठवली की नाही याची माहिती देण्यात यावी. ‘ऑर्डर ऑफ डे’ रात्री बारा वाजेनंतर संकेतस्थळावर देण्यात येत असल्यानं दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाची माहिती सदस्यांसह मंत्र्यांना मिळत नसल्याची खंतही अजित पवारांनी व्यक्त करून दाखविली.
हेही वाचा..चिंचवडमध्ये मतदानाचा टक्का वाढला, कसब्यात घसरला, कुणाला फायदा, कुणाला तोटा?
त्याचबरोबर तत्काळ सुधारणेसह सभागृहाच्या नियम, प्रथा-परंपरांचं योग्यप्रकारे पालन करण्याची पॉईंट ऑफ प्रोसिजरद्वारे अजित पवारांनी मागणी केली. विधिमंडळ सदस्य अतिशय काळजीपुर्वक आणि जबाबदारीनं आपल्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तारांकित प्रश्न, कपात सूचना इत्यादि आयुधांच्या सुचना आपल्या मान्यतेसाठी दाखल करीत असतात. विधिमंडळ सचिवांनी या सुचना मान्यतेसाठी आपल्याला सादर केल्यानंतर सुचना मान्य झाली किंवा अमान्य झाली, हे कळण्याचा सदस्यांचा घटनादत्त अधिकार आहे. असंही अजित पवारांनी म्हटलं.
हेही वाचा..“शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 55 आमदारांना व्हिप बजावला,” ठाकरे गटाचे आमदार व्हिप बजावणार का ?
पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, गेल्या काही काळापासून ही परंपरा पाळली जात नाही. विधानसभा सदस्यांनी दाखल केलेला तारांकित प्रश्न स्वीकृत झाला किंवा अस्वीकृत झाला याबाबतचे ज्ञापन संबंधित सदस्यांना सचिवालयाकडून देण्याची पद्धत बंद करण्यात आलेली आहे. तसंच संबंधित विभागांच्या मागण्या मतदानासाठी ज्या दिवशी कामकाज पत्रिकेत दाखवलेल्या असतात, त्याचदिवशी अध्यक्षांनी मान्य केलेल्या कपात सूचनांची यादी सर्व सदस्यांना टपालाद्वारे प्राप्त व्हायची. परंतु आता हे बंद करण्यात आलं आहे.
Read also
- हेही वाचा..“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोटनिवडणुकीत माझ्याच घरात पैसे वाटले,” रवींद्र धंगेकरांचा मोठा आरोप
- हेही वाचा..राजकारण तापलं…! भाजप हाय हाय, सिसोदिया जिंदाबाद, घोषणा देत आपचं संपुर्ण देशभरात भाजपच्या विरोधात आंदोलन
- हेही वाचा..“महाराष्ट्रातील तरूणांचा आवाज बनून विधानभवनात बाजू मांडणार” सत्यजीत तांबेंचं विधान
- हेही वाचा..“राजकीय दंगलीत कोणी माझ्यासोबत येईल, अशी शक्यता वाटत नाही”, राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
- हेही वाचा..“मनसेचा ‘मॅसल मॅन’ ने मनसेला केला जय महाराष्ट्र, राज ठाकरेंना मोठा धक्का “