मुंबई : निवडणुक आयोगाच्या निकालानंतर पहिल्यांदाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही शिवसेनेकडू सर्वच्या सर्व ५५ आमदारांना व्हिप बजावण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासंदर्भातला हा व्हिप असून, ठाकरे गटाच्या आमदारांनाही हा व्हिप लागू होणार आहे.
हेही वाचा..“चिंचवडमधील मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार, मतदान केंद्रावर मोबाईचा सर्रासपणे वापर
मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पुढील दोन आठवडे या संदर्भात कोणतीही कारवाई करणार नाही, अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा येथे शिवसेनेच्या चाळीस आमदारांची रविवारी बैठक झाली. त्यात अर्थसंकल्पातील रणनीतीवर चर्चा झाली. शिवसेनेच्या आमदारांना व्हीप बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनाला उपस्थित राहावे, यासाठी हा व्हिप असून, जरी कोणी त्याचा भंग केला, तरी त्या आमदारांच्या विरोधात कारवाई केली जाणार नाही, असे गोगावले यांनी सांगितले.
हेही वाचा..चिंचवड अन् कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचं भविष्य मत पेटीत बंद कोण मारणार बाजी?
त्याआधी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांकडे इतर विभागाच्या कामकाजाचं देखील काम देण्यात आलं आहे. माहिती व तंत्रज्ञान, नगर विकास खातं उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम, शंभुराज देसाई, मृदू व जनसंधारण, दादा भुसे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य संजय राठोड, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, तानाजी सावंत, अल्पसंख्यांक विकास अब्दुल सत्तार, पर्यावरण व वातावरणीय बदल दिपक केसरकर, माहिती व जनसंपर्क संदिपान भूमरे, सामान्य प्रशासन, परिवहन गुलाबरा पाटलांकडे देण्यात आला आहे.
हेही वाचा..“बावनकुळे..! तुम्ही उलटं सुलटं बोलू नका, तुम्ही आपलं तोंड सांभळा,” खैरेंचा बावनकुळेंना इशारा
दरम्यान, यातच कालच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बहिष्कार टाकला. त्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची विधानभवनात बैठक पार पडली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकनाथ शिंदेंना घेरण्याची योजना आखण्यात आली. तसेच काल पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली.
हेही वाचा..मतदान केल्यानंतर अश्विनी जगतापांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आज पहिल्यांदाच स्वत:ला…”
तर सर्व क्षेत्रातील अनुशेष अजूनही जशाच्या तसा आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे, हतबल आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात उद्धवलेला असून या संदर्भात तक्रारी करूनही कुठलाही उपयोग होत नाही. राज्यातली यंत्रणाही कुणाच्यातरी दबावाखाली काम करते? असा सवाल करीत अर्थसंकल्पीय अधिवेशन ३० दिवसांच्या ऐवजी दीड महिन्याचं असावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. तसेच अधिवेशनात मी आक्रमक भूमिका घेणार आहे. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Read also
- हेही वाचा..“सर्वसामान्यांचे ‘मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे जवळपास ३ हजार फाईल का तुंबल्या ?”
- हेही वाचा..हेमंत रासनेंकडून आचारसहिंतेचा भंग, विरोधकांकडून कारवाई करण्याची मागणी
- चिंचवडमध्ये तीनपर्यंत ३०.५५ तर कसब्यात 30.05 टक्के मतदान, आपलाच विजय होणार उमेदवारांचा दावा
- हेही वाचा..उद्या समजा, मनसेच्या आमदारांनी मनसेवर दावा ठोकल्यास तुम्ही त्यांना मनसे देणार का? अजित पवारांचा निवडणुक आयोगाला सवाल
- हेही वाचा..“कसबा पेठ पोटनिवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोणाचं बळं, कुणाची ताकद ?