मुंबई : राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महाविकास आघाडीच्या नेत्याची बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषदेत घेऊन मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. राज्यात इतर प्रश्न प्रलंबित असतांना मुख्यमंत्री पोटनिवडणुकांच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत. असा टोला लगावत त्यांनी निवडणुक आयोगाच्या निर्णयावरही भाष्य करत आयोगालाच खडेबोल सुनावले.
हेही वाचा..“नादाला लागू नका नाहीतर, बारामतीत येऊन बारा वाजवेन,” नारायण राणे अन् अजित पवारांमध्ये जुंपली
अलिकडेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गाडीवर हल्ले होत आहेत. तसेच ठाकरे गटातील आमदारांवरांवर चौकशीच ससेमीरा सुरू झाला आहे. रासन साळवी, नितीन देशमुख, वैभव नाईक यांना एसीबीसीच्या नोटीसा आल्या आहेत. मुश्रीफांवर छापे टाकण्यात आले. त राज्यात मोठ मोठे प्रश्न असतांना मुख्यमंत्री मात्र पोटनिवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहेत. असा टोला अजित पवारांनी लगावला.
हेही वाचा..“भाजपने पैसे वाटले, धंगेकरांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, त्यांना ईश्वर..
अजित पवारांनी निवडणुक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. निवडणुक आयोगाची स्वायत्वता टिकली पाहिजे. त्यांच्याबाबत आदर कायम राहिला पाहिजे. तो टिकवण्याची जबाबदारी त्यांची देखील आहे. परंतु निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाणांसदर्भातील दिलेला निर्णय हा अतिशय पक्षपातीपणा आहे. अशी जनभावना तयार झाली आहे.
हेही वाचा..““मराठा कधीही गद्दारी करणार नाही, त्यांचं नाव खराब करू नका, दानवेंचा गुलाबराव पाटलांना इशारा
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच निवडणुक आयोगाने दिलेला निर्णय योग्य ठरला असतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ४० आमदार आणि १२ खासदार एकाबाजूला गेल्यामुळे हा निर्णय घेतला. मग उद्या समजा मनसेचा एका आमदारांनी मनसेवर दावा ठोकला तर मनसे पक्ष त्यांच्या ताब्यात देणार का ? असा खोचक सवालही अजित पवारांनी केला.
Read also
- हेही वाचा..“कसबा पेठ पोटनिवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोणाचं बळं, कुणाची ताकद ?
- हेही वाचा..“चिंचवडमधील मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार, मतदान केंद्रावर मोबाईचा सर्रासपणे वापर
- हेही वाचा..चिंचवड अन् कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचं भविष्य मत पेटीत बंद कोण मारणार बाजी?
- हेही वाचा..“बावनकुळे..! तुम्ही उलटं सुलटं बोलू नका, तुम्ही आपलं तोंड सांभळा,” खैरेंचा बावनकुळेंना इशारा
- हेही वाचा..मतदान केल्यानंतर अश्विनी जगतापांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आज पहिल्यांदाच स्वत:ला…”