मुंबई : महाराष्ट्राचा आवाज बनून त्यांचे प्रश्न, बाजू मांडण्याची संधी मला मिळाली आहे. माझ्या मतदार संघातील, लोकांचे तसेच महाराष्ट्रातील सर्व तरूणांचे या विधानभवनात मांडणार असल्याचे नवनिर्वाचित विधान परिषदचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत असून त्यांनी विधान भवनाच्या परिसरात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..“सर्वसामान्यांचे ‘मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे जवळपास ३ हजार फाईल का तुंबल्या ?”
राज्यात सध्या भाजप आणि शिंदे यांचं सरकार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळी भाजपने ऑफर दिली होती. त्यामुळे तुमचा पाठिंबा नेमका कुणाला असणार आहे. ? यावर मी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली होती. त्यामुळे अपक्ष म्हणून राहणार आहे. परंतु जशी जशी परिस्थितीनुसार जसे जसे प्रश्न निर्माण होतील. तशी भूमिका घेतली जाणारअसल्याचं सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा..हेमंत रासनेंकडून आचारसहिंतेचा भंग, विरोधकांकडून कारवाई करण्याची मागणी
सध्या राज्यात बेरोजगारी आणि सरकारी जुनी पेन्शन योजनांचा कसा उद्रेक झाला आहे. तो प्रश्न मांडायचा आहे. तसेच औद्योगिक विकासाचा समतोल कसा साधला जाऊ शकतो. तसेच त्यातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती कशी निर्माण होईल. त्याचा विचार सध्या करत असून हे सर्व मुद्दे विधानभवनात मांडणार असल्याचं सत्यजीत तांबे यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी काॅंग्रेसच्या भूमिकेवर बोलतांना योग्य वेळ आली की सर्व काही सांगेन असं विधान केलं.
Read also
- हेही वाचा..“राजकीय दंगलीत कोणी माझ्यासोबत येईल, अशी शक्यता वाटत नाही”, राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
- हेही वाचा..“मनसेचा ‘मॅसल मॅन’ ने मनसेला केला जय महाराष्ट्र, राज ठाकरेंना मोठा धक्का “
- हेही वाचा..मतमोजणीपुर्वीच धंगेकर अन् रासनेंच्या अडचणी वाढल्या, दोन्ही उमेदवारांच्याविरोधात गुन्हा दाखल
- हेही वाचा..चिंचवडमध्ये मतदानाचा टक्का वाढला, कसब्यात घसरला, कुणाला फायदा, कुणाला तोटा?
- हेही वाचा..“शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 55 आमदारांना व्हिप बजावला,” ठाकरे गटाचे आमदार व्हिप बजावणार का ?