पनवेल : महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या चिखल झाला आहे. विरोध असेल समर्थन असेल ते सगळं पुर्वी समोरासमोर असायचं. यातच बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या वेळेस विधानभवनात गेलो होतो, तेव्हा समोर सगळे आमदार बसले होते. तेव्हा कळतचं नव्हतं कोण कुठल्या पक्षाचा आहे. असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने मनसे राजभाषा महोत्सवात ते बोलत होते.
हेही वाचा..“मनसेचा ‘मॅसल मॅन’ ने मनसेला केला जय महाराष्ट्र, राज ठाकरेंना मोठा धक्का “
तसेच पुढे बोलतांना म्हणाले की, आपले पुर्वज हे फक्त आपल्या आई-वडिलांकडेचच असतात असं नाही. तर ज्यांनी ज्यांनी हा महाराष्ट्र घडवायला योगदान दिलं आहे. तेही आपले पुर्वजांचा ना त्या सगळ्यांना समजून नाही घेतलं तर आपल्याला महाराष्ट्र कसा कळणार असा सवालही त्यांनी केला. तसेच आपल्याला आपले महापुरूषच कळले नाहीत तर मग जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना फक्त त्यांच्या प्रतिमांना हार घालण्याच्या पलीकडे काहीच करता येत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा..मतमोजणीपुर्वीच धंगेकर अन् रासनेंच्या अडचणी वाढल्या, दोन्ही उमेदवारांच्याविरोधात गुन्हा दाखल
महापुरूषांचे पुतळे उभारायचे नंतर त्याकडे नीट लक्ष पण द्यायचं नाही. फक्त जंयती, पुण्यतिथीला त्या पुतळ्यांची आपल्याला आठवण येते. पुर्वी तक्षशिला, नालंदा विद्यापीठांमध्ये लोकं शिकायला जायची, तसं भव्य ग्रंथालय स्मारकात जगभरातून लोकं ज्ञानासाठी आले पाहिजेत. इतिहासाकडे कसं पहावं हे बाबासाहेब पुरंदरेंकडून मी शिकलो. १९७७ चं बाबासाहेबांचं एक व्याख्यान माझ्याकडे आहे, ते ऐकल्यावर आपण कसं वागलं पाहिजे हे त्यातून कळतं. थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराज असो की डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो ह्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे जगातील एक भव्य ग्रंथालय असावं असं मी सर्वप्रथम सुचवलं होतं. पण आपल्याकडे स्मारक म्हणजे फक्त पुतळे इतकंच डोक्यात येतं. असंही ते म्हणाले.
दरम्यान, आजची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघून तर असं वाटतंय की, मतदाराची किंमत फक्त मतदानाच्या दिवसापुरतीच उरली आहे. निवडणुकीच्या दिवशी या, आम्हाला मतदान करा आणि पुढे काही विचारू नका, आम्ही ठरवू काय करायचं ते अशी परिस्थिती आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतोय… महाराष्ट्रात सध्या जे काही सुरु आहे त्यावर मी २२ तारखेला गुढी पाडव्याच्या मेळाव्यात सविस्तर बोलणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. विरोध असेल समर्थन असेल ते सगळं पूर्वी समोरासमोर असायचं. मी मध्यंतरी बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या वेळेस विधानभवनात गेलो होतो, तेंव्हा समोर सगळे आमदार बसले होते, तेंव्हा कळतंच नव्हतं कोण कुठल्या पक्षाचा आहे. असा सवालही त्यांनी केला.
Read also
- हेही वाचा..अधिवेशनाच्या पुर्वसंध्याला अजित पवारांकडून आमदारांना धडे, सभागृहाच्या नियमाचा वाचून दाखवला पाडा
- हेही वाचा..“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोटनिवडणुकीत माझ्याच घरात पैसे वाटले,” रवींद्र धंगेकरांचा मोठा आरोप
- हेही वाचा..राजकारण तापलं…! भाजप हाय हाय, सिसोदिया जिंदाबाद, घोषणा देत आपचं संपुर्ण देशभरात भाजपच्या विरोधात आंदोलन
- हेही वाचा..“महाराष्ट्रातील तरूणांचा आवाज बनून विधानभवनात बाजू मांडणार” सत्यजीत तांबेंचं विधान
- हेही वाचा..“राजकीय दंगलीत कोणी माझ्यासोबत येईल, अशी शक्यता वाटत नाही”, राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत