मुंबई : राज्यात कांद्याची निर्यात कमी झाल्याने राज्यातील कांद्याचं भाव गडाडले आहेत. तीच परिस्थिती कापसावर देखील आली आहे. त्यामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणात कांदा शेतकऱ्यांच्या घरात तसाच पडून राहिला आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नसल्याने कांदा रस्त्यावर फेकून दिला आहे. यात शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाला आहे. याचा निषेध म्हणून विरोधी पक्षातील नेत्यांनी आज विधानभवनातील परिसर दणाणून सोडला.
हेही वाचा..अधिवेशनाच्या पुर्वसंध्याला अजित पवारांकडून आमदारांना धडे, सभागृहाच्या नियमाचा वाचून दाखवला पाडा
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरू झालं आहे. दुसऱ्याच दिवशी कांदा आणि कापसाला अनुदान मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काही आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा, कापसाच्या माळा घालून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात विरोधकांनी जोरदार केली असून राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा..“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोटनिवडणुकीत माझ्याच घरात पैसे वाटले,” रवींद्र धंगेकरांचा मोठा आरोप
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व आमदारांनी राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी गद्दार सरकार जोमात जोमात, शेतकरी मात्र कोमात कोमात, शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, कांद्याला, कापसाला अनुदान मिळालचं पाहिजे, ईडी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अशा घोषणा महाविकास आघाडीकडून राज्य सरकारच्या विरोधात देण्यात आल्या.
Read also
- हेही वाचा..” राज्यात मोगॅम्बोच्या पिढ्या उतरल्या तरी भिनलेली शिवसेना काढू शकणार नाही”, उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर हल्लाबोल
- हेही वाचा..“..यात राज्यपालांचीही चुक नाही, पण…;” राज्यपालांच्या अभिभाषणावर राष्ट्रवादीची जोरदार टिका
- हेही वाचा..“अमित शहा ईव्हीएम मशीन सॅटेलाईटद्वारे नियंत्रित करतात”, चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा
- हेही वाचा..““मला फसवण्यासाठी माझ्या गाडीत गांजा, चरस अफू..” गिरीश महाजनांचा मोठा दावा
- हेही वाचा..“महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या चिखल झालाय,” राज ठाकरेंचं राजकारणावर प्रखरड भाष्य