मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांना शिंदे सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांची निवड करण्यात आली आहे. या अध्यक्षपदाचा मंत्रिपदाचा दर्जा देण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याने आता बच्चू कडू राज्यमंत्री झाले आहेत. याबाबती शासनाने परिपत्रक काढले आहे. गेल्या वीस वर्षापासून बच्चू कडू दिव्यांगासाठी लढा देत आहेत.
हेही वाचा…राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसच्या उमेदवारांनी केली बंडखोरी, बहुमत असूनही झाला महाविकास आघाडीचा पराभव
दिव्यांगाचं अभियानामध्ये सचिव, कलेक्टर, सर्व अधिकारी हे सर्व एका छताखाली दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. फक्त सेवेसाठी हे अभियान असून मतदार संघात करत असलेल्या कामांसारखाच काम या अभियानात केलं जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील दिव्यांगंचं काम केलं जाणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना ४८ पैकी २ जागा दिल्या तरी ते महाविकास आघाडीत राहतील”
दरम्यान, बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीतील राज्य मंत्री पद सोडून शिंदेंच्या बंडात सहभागी झालेत. त्यानंतर शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बच्चू कडूंना मंत्रिपदाची आशा लागून राहिली होती. त्यांनी अनेकदा मंत्रिपदाची इच्छा बोलूनही दाखवली होती. त्याचाच परिणाम म्हणून बच्चू कडू यांना आता राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला ‘१९’ विरोधी पक्षांनी टाकला बहिष्कार, शरद पवार, ठाकरे, पटोलेंही..
हेही वाचा…भाजपची ऑफर नाकारल्याने जयंत पाटलांना इडीची नोटीस, भाजपात येण्याचा होता दबाव
हेही वाचा…धक्कादायक..! पुण्यात काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या, आत्महत्येचं गुड कायम
हेही वाचा…पुणे जिल्ह्याला नव्या मंत्रिमंडळात १ कॅबिनेट अन् १ राज्यमंत्री…! २ मंत्रिपदासाठी ३ नावं चर्चेत
हेही वाचा…“मनोहर जोशींना संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, राऊतांनी फोन केला, पण..” योगेश कदमांचा मोठा गौप्यस्फोट