मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी राज्यात एकत्रित लढणार असल्याने आता जागा वाटपाबाबत चर्चा केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस युती झाली आहे. त्यामुळे आता लोकसभेच्या ४८ जागांबाबत चर्चा केली जात आहे. यातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. तसेच आता महाविकास आघाडीत जागा वाटपाचा कार्यक्रम हा ठरला असल्याचीही चर्चा आहे. यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना टोला हाणला आहे.
हेही वाचा…माजी मुख्यमंत्री ‘मनोहर जोशीं’ची तब्येत खालवली, रूग्णालयात दाखल, ठाकरे तातडीने रवाना
उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीत ४८ पैकी २ जागा तरी दिल्या, तरी ते महाविकास आघाडीमध्ये राहणं पसंत करतील. त्यांच्या पक्षातून ४० आमदार आणि १२ खासदार गेले आहेत. त्यामुळे पक्ष संपला तरी चालेल तरी ते सोडणार नाही. तसेच काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतकं बार्गेनिंक करणार आहेत की, त्यांची किंचित सेना अंडरग्राऊंड केल्यावर राहणार नाही.
हेही वाचा…फडणवीसांचे भाषण, केसरकरांच्या डुलक्या, ‘फडणवीस’ म्हणाले, ‘मी पुन्हा येईन,’ ‘केसरकर’ खडकन उठले, व्हिडीओ व्हायरल
यातच आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २३, शिवसेना १८, काॅंग्रेस १, राष्ट्रवादी काॅंग्रेस ०४ आणि एमआयएमला एक जागा जिंकण्यात यश मिळालं होतं. आता शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. यातच आता २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूका लढल्यास मागच्या असलेल्या जागा तशाच ठेऊन उरलेल्या जागांवर चर्चा करावी. असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मला स्टॅम्प पेपर द्या, 100 % खात्रीने मी लिहून देतो की..”, अजित पवारांनी केला मोठा ‘हा’ दावा, भाजप संकटात
दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने २०१९ च्या जिंकलेल्या शिवसेना ठाकरे गट १८, राष्ट्रवादी ४, काॅंग्रेस १ अशा २३ जागा तशाच ठेवल्या जाणार असल्याची चर्चा आहे. तर यात आता उरलेल्या २५ जागा वाटपाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. तर २०१९ मध्ये काॅंग्रेसने १८ जागा लढविल्या होत्या तर राष्ट्रवादीने ०८ आणि एक जागा अपक्षासाठी सोडली होती. त्यामुळे आता जागा वाटपाचा फार्म्युला कसा ठरणार ते पाहणं महत्वाचं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नाना पटोलेंनी ‘तो’ गड राखला, राष्ट्रवादीला भोपळा, तर काॅंग्रेसची एकहाती सत्ता
हेही वाचा…आदित्य ठाकरेंचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून लागले बॅनर्स..!, “शिल्लक सेनेत ‘सरपंच’ तरी होतील का ?” भाजपची टिका
हेही वाचा…मनोहर जोशींबाबत रूग्णालयातून आली अपटेड, ब्रेन ट्युमरचा त्रास, आयसीयुत उपचार
हेही वाचा…आघाडीचा जागावाटपाचा फार्म्युला ठरला..! त्या ‘२३’ जागा तशाच राहणार, आता ‘२५’ जागांचा प्रश्न, कुणाच्या वाटेला किती ?
हेही वाचा…“उद्धव ठाकरे बेडवर आजारी असतांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं”