मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीने तब्बल ९ तास चौकशी केली. आयएल अॅण्ड एफएस या कंपनीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यावरून राष्ट्रवादीने ईडी आणि भाजपच्या विरोधात रान पेटवून मुंबईत जोरदार आंदोलन केले. आता यावरूनच जंयत पाटलांवर भाजपमध्ये येण्याचा दबाव असल्याचं सांगत सामानातून भाजपवर जोरदार टिकास्त्र सोडण्यात आलं आहे.
हेही वाचा…नाना पटोलेंनी ‘तो’ गड राखला, राष्ट्रवादीला भोपळा, तर काॅंग्रेसची एकहाती सत्ता
जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच इडीने त्यांना बोलवणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या. यात आश्चार्य वाटण्यासारखे काहीच नाही. ईडीने अनेकांच्या बाबतीत हे घडवले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या घरगड्यांसारख्या वागत आहेत. असंही सामानातून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा…आदित्य ठाकरेंचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून लागले बॅनर्स..!, “शिल्लक सेनेत ‘सरपंच’ तरी होतील का ?” भाजपची टिका
जयंत पाटील यांची साडेनऊ तास चौकशी होते, पण भाजपमधील भ्रष्टाचाऱ्यांना मोकळे रान मिळते. मात्र चौकश्यांचा कितीही फेरा मागे लावलात तरी स्वाभिमानींना शात झोप लागते हे जयंत पाटील यांनी दाखवून दिले. पाटला पाटलांत फरक असतो.काही पाटलांचे पाणीच वेगळीच असते. त्यापैकीच जंयत पाटील एक आहेत. असं म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…धक्कादायक..! पुण्यात काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या, आत्महत्येचं गुड कायम
हेही वाचा…पुणे जिल्ह्याला नव्या मंत्रिमंडळात १ कॅबिनेट अन् १ राज्यमंत्री…! २ मंत्रिपदासाठी ३ नावं चर्चेत
हेही वाचा…“मनोहर जोशींना संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, राऊतांनी फोन केला, पण..” योगेश कदमांचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा…राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसच्या उमेदवारांनी केली बंडखोरी, बहुमत असूनही झाला महाविकास आघाडीचा पराभव
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना ४८ पैकी २ जागा दिल्या तरी ते महाविकास आघाडीत राहतील”