मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर भाजपने कंबर कसली असून त्याची जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. मंत्रिपदाची अपेक्षा न ठेवता आता लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागा असे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिले आहेत. लोकसभेच्या सर्व जागा निवडून आणायच्या आहेत. लोकसभेच्या ४८ जागापैकी ४५ पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. असे भाजपच्या नेत्यांना सांगण्यात आले आहेत.
हेही वाचा…लोकसभेतल्या सलग दुसऱ्या भाषणात सुळेंचा अजित पवारांवर हल्लाबोल, राष्ट्रवादीत वाद वाढत चाललंय का ?
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा पैकी ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं भाजपने लक्ष्य ठेवलं आहे. या मिशनसाठी काही केंद्रीय मंत्र्यांनी राज्याचे दौरे सुरू केले आहेत. आता भाजपचे प्रमुख नेते विधानसभेच्याही १४४ मतदारसंघात दौरे करणार असून निवडणुकीची रणनीती आखणार आहेत. भाजपच्या मिशन ४५ साठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा…“समज देऊनही ऐकले नाही तर देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना पक्षातून काढून टाकावे”, राष्ट्रवादीची मागणी
दरम्यान, लोकसभेच्या मिशन ४५ साठीचे भाजपने १२ शिलेदार निवडले आहेत. भाजपने १२ प्रमुख नेत्यांची या मिशनसाठी निवड केली असून प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ सोपवले आहेत. यामध्ये आशिष शेलार, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे अशा प्रमुख नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं ४८ जागापैंकी २३ जागा जिंकल्या होत्या. तर १८ जागा शिवसेनेला मिळाल्या. चार जागांवर राष्ट्रवादी काॅंग्रेस तर काॅंग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला होता.
READ ALSO :
हेही वाचा…महाराष्ट्रात दुष्काळाच्या तीव्र झळा, तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, आकडा ऐकून थक्क व्हाल
हेही वाचा…“राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होणार , 27 वर्षाची प्रतिक्षा संपुष्टात येणार का ?”
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची राजकीय तिरडी बांधलीय, आता फक्त..,” खासदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“बहुजन समाजाने खडबडून जागं व्हावं..,”आव्हाडांचं आवाहन, केंद्र सरकारच्या ९० सचिवांपैकी फक्त ३ च ओबीसी
हेही वाचा…“तर पिंपरी-चिंचवड, मावळ मतदारसंघात महिलाराज येईल,” राजकीय गणितं काय सांगतात ?