मुंबई : राज्यात या वर्षी पाऊस कमी झाल्याने महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा अगदी तीव्र झाल्या आहेत. गेल्या अडीच महिन्यांमद्ये राज्यात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. हीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात दुष्काळाचं मोठं संकट महाराष्ट्रावर येऊ शकतं. ही शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातच आता राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलै पर्यंत तब्बल १५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. याची जिल्हावार आकडेवारी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जाहिर केली आहे.
हेही वाचा…“समज देऊनही ऐकले नाही तर देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना पक्षातून काढून टाकावे”, राष्ट्रवादीची मागणी
मागच्या वर्षाप्रमाणे यावर्षी राज्यात पावसाचं सावट कमी झालं आहे. राज्याच्या काही भागात कमी अधिक प्रमाणात पडला असला तरी उर्वरित भागात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत पडले आहेत. यातच आता मागील काही महिन्यात राज्याच्या विविध भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट पडलं असून अनेक शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. दुष्काळी संकट आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे अहवाल पुढे आले आहे. आपल्याला काय ? आपल्याला फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळं व्हायचं आहे, हाच पॅटर्न सरकार चालवताना महायुतीने हाती घेतला आहे. अशी टिका देखील वडेट्टीवारांनी केलीय.
हेही वाचा…“तर नारायण राणेंना कोंबडीचोर म्हणणं ही..,” अजित पवार गटातील नेत्याचं राणेंना जोरदार प्रत्युत्तर
राज्यात 1 जानेवारी ते 31 जुलै पर्यंत तब्बल 1555 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
अमरावती विभागात सगळ्यात जास्त आत्महत्या
अमरावती विभागात 637 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
अमरावती विभाग
अमरवती 183
बुलढाणा 173
यवतमाळ 149
अकोला 94
वाशीम 38
औरंगाबाद विभाग
औरंगाबाद विभागात 584 शेतकरी आत्महत्या
बीड 155
उस्मानाबाद 102
नांदेड 99
औरंगाबाद 86
परभणी 51
जालना 36
लातूर 35
हिंगोली 20
नागपूर विभाग
नागपूर विभागात 144 शेतकरी आत्महत्या
चंद्रपूर 73
वर्धा 50
नागपूर 13
भंडारा 05
गोंदिया 03
नाशिक विभाग
नाशिक विभागात 174 शेतकरी आत्महत्या
जळगाव 93
अहमदनगर 43
धुळे 28
नाशिक 07
नंदुरबार 03
पुणे विभाग
पुणे विभागात 16 शेतकरी आत्महत्या
सोलापूर 13
सातारा 02
सांगली 01
(पुणे आणि कोल्हापूर शून्य शेतकरी आत्महत्या)
कोकण विभागात शेतकरी आत्महत्या नाही
सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या जून महिन्यात
शेतकरी आत्महत्या
जानेवारी 226
फेब्रुवारी 192
मार्च 226
एप्रिल 225
मे 224
जून 233
जुलै 229
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होणार , 27 वर्षाची प्रतिक्षा संपुष्टात येणार का ?”
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची राजकीय तिरडी बांधलीय, आता फक्त..,” खासदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“बहुजन समाजाने खडबडून जागं व्हावं..,”आव्हाडांचं आवाहन, केंद्र सरकारच्या ९० सचिवांपैकी फक्त ३ च ओबीसी
हेही वाचा…“तर पिंपरी-चिंचवड, मावळ मतदारसंघात महिलाराज येईल,” राजकीय गणितं काय सांगतात ?
हेही वाचा…लोकसभेतल्या सलग दुसऱ्या भाषणात सुळेंचा अजित पवारांवर हल्लाबोल, राष्ट्रवादीत वाद वाढत चाललंय का ?