मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. कारण दिवसें-दिवस त्यांच्या अडचणी वाढत चालल्या असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अज्ञातवासात असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या हालचाली पुन्हा वाढल्या आहेत.
मित्र असावा तर असा; माजी खासदार दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव
त्यांचा ठावठिकाणा मिळविण्यासाठी सक्तवसुली संचालनालय, (ईडी) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) कळविण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यांना पकडण्यासाठी मुंबई, नागपूर या ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी केली जाण्याची शक्यता आहे.
व्हायरलं ऑडिओ क्लिप प्रकरण पडलं महागात; शिवसेनेतून रामदास कदमांचा पत्ता होणार कट?
मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी ईडीने गेल्या पाच महिन्यांत चौकशीला हजर राहण्यासाठी पाच वेळा समन्स जरी केले होते. पण ते एकदाही हजर झालेले नाहीत. त्याचप्रमाणे सीबीआयने त्यांच्या कार्यालय व घरावर पाचवेळा छापे टाकले आहेत. देशमुख यांनी आपल्यावरील कारवाई रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, त्यांना दिलासा न मिळाल्याने सीबीआय व ईडीकडून अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशमुख हे अज्ञातवासात आहेत. मात्र, वरिष्ठांनी त्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्याने पुन्हा गतीने हालचाली करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Read Also :
- देगलुरमध्ये भाजप उमेदवाराला निवडुण द्या, मी गाव जेवण देतो – चंद्रकांत पाटलांची ऑफर
- महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं, आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर
- काँग्रेसमध्ये नाराजी: सचिन सावंत यांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा, अतुल लोंढेंची मुख्य प्रवक्तेपदी निवड
- मतदार याद्यांमधून मुस्लीम आणि दलितांची नावे कापली जात आहेत; मंत्री जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
- पुण्यात 2022ला आरपीआय’चा महापौर होणार, देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिलायं – रामदास आठवले