ठाणे : निवडणुकीच्या मतदार यादीतून मुस्लीम आणि दलितांची नावे जाणीवपूर्वक कापली जात आहेत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पुढीलवर्षी ठाणे महानगर पालिकेची निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययाववत करण्यात येत आहेत. मात्र, मुंब्रा-कळवा मतदारसंघातील अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
आमदार रवी राणांचा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राडा; नियोजन भवनासमोर कुजलेल्या सोयाबीनची केली होळी
डॉ. आव्हाड यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकांच्या आधी फक्त मुंब्रा- कळव्याच्याच नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आलेला आहे. मुंब्रा येथे 20 ते 30 हजार मतदारांची नावे कापण्यात आलेली आहेत. त्यासाठी स्थलांतरन असा शेरा मारण्यात आलेला असला तरी सद्यस्थितीमध्ये ते मतदार त्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. ही नावे गाळण्यामागे जबाबदार कोण आहे, याचा विचार केल्यास ही जिल्हाधिकार्यांची आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम होत असते. म्हणून आमची मागणी आहे की, मतदार याद्यांची फेरतपासणी करावी आणि जे चुकीच्या पद्धतीने स्थलांतरीत दाखविण्यात आलेले आहेत. ते स्थलांतरन रद्द करुन संबधित मतदारांना पूर्ववत यादीमध्ये समाविष्ट करावेत, अशी सूचना जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
पंकजा मुंडेवर भाजपने सोपविली मोठी जबाबदारी; मध्यप्रदेशातील निवडणुकीचा प्रचार करणार
दरम्यान, संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकारच काढून घेण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकारी करीत आहेत. खासकरुन मुस्लीम आणि दलितांची नावे कापली जात आहेत, असा आरोपही डॉ, आव्हाड यांनी केला.
Read Also :
- पुण्यात 2022ला आरपीआय’चा महापौर होणार, देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिलायं – रामदास आठवले
- अजिबात टेंन्शन घेवू नका, महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येत नाही – राजेश टोपे
- मित्र असावा तर असा; माजी खासदार दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव
- ईडीची पुढची कारवाई काँग्रेस नेते अशोक चव्हाणांवर? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने नांदेडमध्ये उडाली खळबळ
- व्हायरलं ऑडिओ क्लिप प्रकरण पडलं महागात; शिवसेनेतून रामदास कदमांचा पत्ता होणार कट?