मुंबई : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या नव्या नियुक्त्यांमुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे. सचिन सावंत यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. हायकमांडला थेट पत्र लिहून प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. मागील १० वर्ष सचिन सावंत पक्षाचे मीडिया इंचार्ज म्हणून काम करत होते. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांना डावलण्यात आलं, त्यातच पक्षात मुख्य प्रवक्तेपद तयार करून त्या पदावर सचिन सावंत यांना डावलून अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे सचिन सावंत यांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. सचिन सावंत यांनी ट्विटर बायो मधून प्रवक्ते हे देखील हटवले आहे.
व्हायरलं ऑडिओ क्लिप प्रकरण पडलं महागात; शिवसेनेतून रामदास कदमांचा पत्ता होणार कट?
सचिन सावंत हे गेल्या दहा वर्षापासून काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. मधल्या काळात त्यांना विधानपरिषदेवरही पाठवणार असल्याची चर्चा होती. सावंत यांनी सातत्याने भाजपला अंगावर घेतले होते. काँग्रेसची नेमकी भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि भाजपला सडेतोड उत्तर देण्याचं कामही ते करत होते. शिवाय पक्ष चर्चेत ठेवण्याचंही काम त्यांनी केलं होतं. मात्र, आज झालेल्या नियुक्त्यांमध्ये त्यांना डावलून अतूल लोंढे यांना मुख्य प्रवक्तेपद देण्यात आलं. त्यामुळे सावंत नाराज झाले असून या नाराजीतूनच त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. सावंत यांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस हायकमांडला पाठवल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आमदार रवी राणांचा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राडा; नियोजन भवनासमोर कुजलेल्या सोयाबीनची केली होळी
दरम्यान, आज जाहीर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये नाना पटोले यांच्या समर्थकांचीच सर्वाधिक वर्णी लागली आहे. अतुल लोंढे हे पटोले समर्थक असल्यानेच त्यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याचं सांगण्यात येत आहे. माध्यम आणि संवाद विभागाची तसेच मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अतुल लोंढे यांच्याकडे सोपवण्यात आली असून सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत आणि जाकीर अहमद यांचाही या समितीत समावेश आहे. अध्यक्ष व मान्यवरांच्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. तर सोशल मीडिया विभागाचा प्रभार प्रदेश सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांच्याकडे देण्यात आला आहे.
Read Also :
- मतदार याद्यांमधून मुस्लीम आणि दलितांची नावे कापली जात आहेत; मंत्री जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
- पुण्यात 2022ला आरपीआय’चा महापौर होणार, देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिलायं – रामदास आठवले
- अजिबात टेंन्शन घेवू नका, महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येत नाही – राजेश टोपे
- मित्र असावा तर असा; माजी खासदार दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव
- ईडीची पुढची कारवाई काँग्रेस नेते अशोक चव्हाणांवर? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने नांदेडमध्ये उडाली खळबळ