नांदेड : सांगली महापालिकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा शॉक द्या, तुम्हाला सोन्याचा मुकुट घालेन, अशी ऑफर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना ऑफर दिली आहे. देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला आघाडी द्या, मी तु्हाला गाव जेवण देईन, अशी खुली ऑफरच चंद्रकांत पाटील यांनी देगलूरच्या कार्यकर्त्यांना दिली आहे.
मित्र असावा तर असा; माजी खासदार दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव
देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी काल रात्री ही अनोखी ऑफर दिलीय. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असल्याचे पाटील यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे या गाव जेवणात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केलं. पाटील यांच्या गाव जेवणाच्या ऑफरमुळे ते चांगलेच चर्चेत येण्याची शक्यता आहे. तसेच सध्या देगलूर-बिलोली विधानसभेत पाटील यांच्या ऑफरची चांगलीच चर्चा रंगली आहे.
देगलूर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी काँग्रेस पाठोपाठ भाजपने कंबर कसलीय. भाजपने या निवडणुकीत आतापर्यंत रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, भागवत कराड आणि आशिष शेलार या प्रमुख नेत्यांना प्रचारात उतरवलंय. भागवत कराड यांनी देगलूर पोट निवडणुकीसाठी गावोगावी प्रचार सभा घेतल्या आहेत. खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. काँग्रेस आणि भाजपच्या प्रचारसभामुळे देगलूरमध्ये आता रंगत येत आहे.
व्हायरलं ऑडिओ क्लिप प्रकरण पडलं महागात; शिवसेनेतून रामदास कदमांचा पत्ता होणार कट?
दरम्यान, सांगलीतही त्यांनी अशीच एक ऑफर दिली होती. सांगली महापालिकेत ‘कार्यक्रम’ करणाऱ्या नेत्यांना तुम्ही दोन छोटे शॉक दिले आहेत. एकदा एक ‘मोठा शॉक’द्या. तुमचा सोन्याचा मुकुट घालून सत्कार करतो, असं सांगत पाटील यांनी महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या सत्कारप्रसंगी नवे ‘टार्गेट’ दिले होते.
Read Also :
- महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं, आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर
- काँग्रेसमध्ये नाराजी: सचिन सावंत यांचा प्रवक्तेपदाचा राजीनामा, अतुल लोंढेंची मुख्य प्रवक्तेपदी निवड
- मतदार याद्यांमधून मुस्लीम आणि दलितांची नावे कापली जात आहेत; मंत्री जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट
- पुण्यात 2022ला आरपीआय’चा महापौर होणार, देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिलायं – रामदास आठवले
- अजिबात टेंन्शन घेवू नका, महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येत नाही – राजेश टोपे