रायगड : गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते सरकारमध्ये सामील झाल्याने मंत्रीपदाची आस लावून बसलेल्या शिंदे गटातील आमदारांची निराशा भंग झाली आहे. परंतु येत्या काही दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा रंगली असतांना शिंदे गटातील आमदार भरतशेठ गोगावले यांनी देखील पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात स्थगिती उठवली, कोणाची नावं चर्चेत ?
मंत्रिपदाबाबत भरतशेठ गोगावले यांना विचारले असता. ते म्हणाले की, मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी आम्ही केव्हापासूनच तयार आहोत. फक्त फोन येऊ द्या, निरोप येऊ द्या, मग आम्ही निघालोच, असं म्हणत भरतशेठ गोगावले यांनी मंत्रिपद मिळणारच या आवेशाने विधान केलं आहे.
हेही वाचा…पंकजा मुंडे ‘या’ विधानसभा मतदारसंघातून लढणार, धनंजय मुंडे सत्तेत सहभागी झाल्याने झाला होता पेच
दरम्यान, काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्च झाली असली तरीही अजून कोणताही निरोप आलेला नाही. पण लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आम्हाला असं वाटतंय की येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“चक्की पिसिंग पिसिगंवर आरोप केले, त्याचं काय झालं?” अजित पवारांवरून ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
हेही वाचा…मोदींना पवारांच्या हस्ते पुरस्कार, मग ७० हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं काय ? ठाकरेंचा सवाल
हेही वाचा…राष्ट्रपती भवनात जय्यत तयारी, केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार आणि शिंदे गटाला स्थान, १२ जुलै होण्याची शक्यता
हेही वाचा…राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंनाही धमकीचा फोन, ५० लाखांची केली मागणी
हेही वाचा…“अजित पवारांचा पुतण्या शरद पवारांच्या भेटीला, काका-पुतण्याच्या संघर्षात मोठा ट्वविस्ट”